शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेची वाटचाल - अमित शहा

By admin | Updated: May 19, 2016 16:07 IST

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेने अजून दोन पावलं टाकली आहेत असा टोमणा मारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 19 - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेने अजून दोन पावलं टाकली आहेत असा टोमणा मारला आहे. अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आसाममधील पक्षाच्या विजयासोबत इतर राज्यांमधील पक्षाच्या कामगिरीवर मत मांडले. 
 
ज्यांनी संसदेतील कामकाजात अडचण आणली, मुद्द्यांचं राजकारण केलं त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला असल्याचं निकालावरुन स्पष्ट होत आहे. अडवणुकीचं राजकारण करणा-या काँग्रेस पक्षाला हा निकाल धडा आहे. निकाल पाहून कोणीही काँग्रेससोबत जाण्याची हिंमत करणार नाही. जे गेले आहेत त्यांचा पराभव झाला असल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे. 
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
निवडणुकीतील निकालामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 वर्षाच्या कार्यकाळावर आनंदी असल्याचं स्पष्ट होत आहे असं अमित शहा बोलले आहेत. आसाममधील विजय अत्यंत महत्वाचा आहे. आसामला विकसित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही अमित शहा यांनी दिलं आहे. 
 
राजकारणाला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम आम्ही केलं असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा अमित शहा यांनी केला आहे. भाजपाला स्वत:च्या बळावर बहुमत मिळालं आहे. 2019 मध्ये आमच्या कामगिरीच्या आधारावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. देशाच्या विकासासाठी ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत असल्याचंही अमित शहा बोलले आहेत.