शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 2:58 PM

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्देजेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे.

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. 

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे. तर, अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करुन, 'सिद्दीक कप्पन… उमर खालिद… कहीं और हैं’।'... असे ट्विट स्वराने केलंय. म्हणजेच उमर खालिद अन् सिद्दीक कप्पनला अद्याप जामीन मिळाला नसल्याकडे स्वराने लक्ष वेधले. स्वराच्या या ट्विटनंतर नेटीझन्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणाऱ्या न्यायव्यवस्थेवर तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात का? असा सवाल एका ट्विटर युजर्संने विचारला आहे. 

जेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे. तर, रिंकू नावाच्या एका ट्विटर युजर्सने, मुलगा शाहरुख खानचा असेल तर जामीन मिळणे हा त्याचा अधिकार आहे. आणि मुलगा भाजपचा नेता असेल तर जामीन कसा मिळाला? असा खोचक टोला लगावला आहे. 

चित्रपट निर्माता आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कापडी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कुचलणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला जामीन मिळाला, पण हाथरस गँगरेप कव्हर करणारे पत्रकार सिद्दिकी कप्पन 1 वर्षांपासून तुरुंगातच आहे. तर, जयराज सिंह यांनी ट्विट करुन जामीनावर प्रश्न उपस्थित केला आहे. आशिष मिश्राला जामीन मिळाला, उमर खालीदला नाही, असे सिंह यांनी ट्विट केले आहे. 

लखीमपूर खेरी हिंसाचार काय

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेनीचा मुलगा आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :Swara Bhaskarस्वरा भास्करUmar Khalidउमर खालिदlakhimpur-pcलखीमपुर