शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर किती वर्ष टिकणार? ‘या’ महिन्यापासून भाविक दर्शन घेऊ शकणार; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 08:48 IST

Ram Mandir: राम नवमीच्या दिवशी सात लाख रामभक्त येथे येऊन दर्शन घेऊ शकतील, असा विश्वास नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराम मंदिर उभारणीचे काम प्रगतीपथावरदुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांच्या चरणावर सूर्याची किरण पडणारराम नवमीच्या दिवशी सात लाख भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था

अयोध्या: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या (Ayodhya) विवादावर दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर सर्वांच्याच नजरा आता राम मंदिराकडे लागल्या आहेत. राम मंदिर (Ram Mandir) भाविकांना दर्शनासाठी कधी खुले होणार, याबाबत राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती दिली आहे. तसेच राम मंदिराचे काम कुठपर्यंत आले आहे. याशिवाय किती मजबूत आहे तसेच ते किती वर्षांपर्यंत टिकू शकेल, याबाबतही मिश्रा यांनी माहिती दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, डिसेंबर २०२३ पासून भाविकांना अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेता येईल. डिसेंबर २०२३ पर्यंतचा कालावधीत निर्धारित केला गेला असून, त्यानुसारच राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. राम मंदिर निर्माणासाठी अनेक आव्हाने येत आहेत. मात्र, त्यावर मार्ग काढत राम मंदिर उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.

राम मंदिर किती वर्षे टिकणार?

राम मंदिर बांधताना स्टीलचा वापर केला जात नाहीए. तसेच सिमेंटही कमीत कमी वापरले जात आहे. राम मंदिरासाठी अन्य गोष्टींच्या वापरावर अधिकाधिक भर दिला जात आहे. आपल्या देशात ५०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली मंदिरे आजही मजबुतीने उभी आहेत. त्या मंदिरांचा अभ्यास करूनच राम मंदिर बांधले जात आहे. तशाच प्रकारचे निर्णय घेण्यात आले असून, काम योग्य पद्धतीने सुरू आहे, असेही मिश्रा म्हणाले.

कोणार्क मंदिराप्रमाणे रचना 

राम मंदिराची रचना करताना दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. शास्त्रज्ञ आणि अन्य तज्ज्ञ तशी रचना करण्याचे काम करत आहेत. यासाठी कोणार्क येथील मंदिराचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे आणि तशाच प्रकारचा झडपा तयार करण्यात येणार आहेत, असेही मिश्रा यांनी सांगितले.

एका दिवसांत लाखो भाविक घेऊ शकणार दर्शन

राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर एका दिवसाला लाखो श्रद्धाळू येऊ शकतील. तसेच एका सेकंदाला सात भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात असून, राम नवमीच्या दिवशी सात लाख रामभक्त येथे येऊन दर्शन घेऊ शकतील, असा विश्वास नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला. ते आजतक आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या