शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

मुंबईनंतर आता बळीराजाची राजधानीत धडक; कर्जमाफीसाठी एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 3:55 PM

सरकार अश्वासने देत आहे, मात्र ते पूर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहे.

नवी दिल्ली - सहा दिवस 180 किलोमीटर पायपीट करत काल मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन शमले तोपर्यंत राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यंनी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले आहे. 

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी महापंचात अंतर्गत कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जाला कंटाळून प्रत्येक दिवशी शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळं सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. नवी दिल्लीमध्ये आलेल्या काही शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला की, जर सरकारने कर्जमाफी नाही केल्यास 2019 च्या निवडणूकीत त्याचे पडसाद दिसून येतील. 

 

भारतीय किसान युनियन यांच्या मतानुसार शेतकरी दररोज नवनव्या आडचणीमध्ये अडकत आहे. सरकार अश्वासने देत आहे, मात्र ते पुर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवर सरकारने मौन बाळगले आहे. स्वामिनाथन आयोगामध्ये शेतकऱ्यांचे हितेचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र यावर कोणतीही आमंलबजावणी केली जात नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्या भाव मिळत नाहीत.

भारतीय किसान युनियन यांनी वीज बिलासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या त्रासाचाही यावेली निशेध केला. शेतकरी म्हणाले की, जर शेतामध्ये पिकलेल्या मालाला किंमत मिळत नसेल तर शेतकरी विज बिल कसे भरणार...आज शेतातील मालाला दमडीची किंमत मिळत असल्यामुळं काही शेतकरी ते रस्त्यावर फेकून देतात...

गेल्या कित्येक दिवसांपासून देशांमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक उडत आहे. प्रत्येक राज्यात मोर्चे निघत आहेत. सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकरकडून मात्र अश्वासने दिली जातात त्यावर आंमलबजावणी कधी होणार माहित नाही. असे आंदोलनात आलेल्या एका शेतकऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च