शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा निर्णय फसला - विरोधकांचे टीकास्त्र

By admin | Updated: December 27, 2016 19:16 IST

नियोजन आणि पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 27 - ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचाऱ्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही, असे टीकास्त्र विरोधी पक्षांनी आज मोदी सरकारवर सोडले. आज दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि तृणमूलसह अन्य विरोधी पक्षांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे काहीच नुकसान झाले नाही. देशातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांना मात्र या हेकोखोर निर्णयामुळे त्रास होत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच हा निर्णय फसल्याने त्याची जबाबदारी स्वीकारून मोदींनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली. 
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह राजद आणि डीएमकेचे नेते उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी तसेच अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी नोटाबंदीचा निर्णय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले. यावेळी राहुल गांधींनी मोदीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला, ते म्हणाले,  "नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांनी अनेक पळवाटा काढून काळ्याचे पांढरे करून घेतले. मात्र नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, गरीब शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे" यावेळी सहारा आणि बिर्लांकडून मिळालेल्या पैशांवरून मोदींविरोधात पुन्हा निशाणा साधत राहुल यांनी पंतप्रधानांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. 
यावेळी नोटाबंदीवरुन सरकारविरोधात सुरुवातीपासूनच आघाडी उघडणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली. मोदी आणि नोटाबंदी विरोधात विरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'नोटाबंदीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत, मोदींनी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. ते हेच अच्छे दिन का?' नोटाबंदीमुळे देश 20 वर्षे मागे गेला असून,  गोरगरीब जनता उपाशीपोटी राहिली तरी नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, असा घणाघातही त्यांनी केला. मोदी सरकार कॅशलेसवरून बेसलेस झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेताना सरकारने संसदेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला."नोटाबंदीबाबत सरकारने संसदेत काहीही माहिती दिली नाही, संसदेला विश्वासात घेतले नाही. संसदेला विश्वासात न घेता नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे, " असे त्या म्हणाल्या. यावेळी राजद तसेच इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही नोटाबंदीविरोधात टीका केली. मात्र डावे आणि संयुक्त जनता दलाची अनुपस्थिती  या पत्रकार परिषदेत प्रकर्षाने जाणवली.