शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘विमान कर्मचाऱ्यांवर निराधार आरोप नको’; इंडियन पायलट्स संघटनेने अमेरिकन अहवाल फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:14 IST

Air India Plane Crash Report: चौकशीमध्ये विमानविषयक तज्ज्ञ समावेशाची मागणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील तांत्रिक बिघाडाचा केंद्र सरकारने पुन्हा आढावा घ्यावा तसेच या चौकशीत संबंधित विषयातील तज्ज्ञांचा समावेश करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) या संघटनेने गुरुवारी केली. १२ जून रोजी झालेल्या या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालाबाबत एफआयपीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

एफआयपीने सांगितले की, या विमानाची दोन्ही इंजिन आपोआप बंद होण्याची शक्यता ज्यामुळे उद्भवली असती त्या तांत्रिक गोष्टींचा एएआयबीच्या अहवालात नीट विचार केलेला नाही. ही गोष्ट एफपीआयने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून कळविली आहे. त्यात म्हटले आहे की, अहमदाबाद येथे विमानाला झालेल्या अपघाताबद्दलचा प्राथमिक अहवाल वेळेत सादर केला ही उत्तम गोष्ट झाली. मात्र या विमानातील पायलटच्या काय चुका झाल्या असाव्यात याचा कोणत्याही ठोस पुराव्याविना एएआयबीने अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

एफआयपीने म्हटले आहे की, बोईंग विमानाच्या प्रणालीमध्ये दोष असतानाही त्याचे खापर पायलटवर फोडण्यात आल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. अहमदाबाद विमान अपघातात पायलटची चूक असल्याचे आडमार्गाने सुचविणे हे अयोग्य आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने काढले जाऊ शकतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर तसेच टीसीएमए, इइसी, एफएडीइसी या प्रणालींमधील तांत्रिक बिघाडांचा आढावा घेण्याची मागणी या संघटनेने केली आहे. 

‘विमान कर्मचाऱ्यांवर निराधार आरोप नको’एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही निराधार आरोप करू नयेत असे एअरलाइन पायलट्स असोसिएशन-इंडिया (अल्पा-इंडिया) या पायलटच्या संघटनेने गुरुवारी म्हटले आहे. अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताबाबत कोणतेही ठोस पुरावे नसताना पायलटना जबाबदार धरू नये, असेही पायलटच्या संघटनांचे मत आहे. 

स्टॅबिलायझरमधील बिघाडाचीही चौकशी करा’अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या चौकशीत स्टॅबिलायझरमधील संभाव्य बिघाडाचाही विचार व्हावा, असे विमानतज्ज्ञ कॅप्टन एहसान खालिद यांनी म्हटले आहे. रेकॉर्डरमधील स्टॅबिलायझरशी संबंधित माहिती तपासली पाहिजे. कारण दुरुस्ती नीट न झाल्यामुळे अपघात झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया