शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची गरज - मोहन भागवत

By admin | Updated: September 21, 2015 12:07 IST

पटेल समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेलने असतानाच आरक्षण धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - पटेल समुदायाला आरक्षण देण्याची मागणी करत हार्दिक पटेलने संपूर्ण गुजरात ढवळून काढला असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांनी हा विचार मांडला आहे.
 
एक बिगरराजकीय समिती तयार करून आरक्षणाच्या मुद्याचा आढावा घेण्याची गरज आहे. कोणाला किती व कधीपर्यंत आरक्षण दिले जावे याचा विचार या समितीतील तज्ञ करतील. मात्र या समितीत राजकीय नेत्यांऐवजी सामाजिक सेवा करणा-या व्यक्तींना प्राधान्य दिले जावे, असे मतही त्यांनी मांडले. राजकीय फायद्यासाठी आरक्षणाचा वापर करण्यात येत असल्याने त्याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीत आपल्या हितासाठी काही समूह एकत्र येतात, पण आपल्या महत्वकांक्षेपायी अन्य वर्गांच्या हितांच नुकसान होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले.
सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या वर्गाला आरक्षण दिले पाहिजे असे संविधानात नमूद केले आहे. मात्र आज आरक्षणाचा राजकारणासाठी वापर होतो. जर संविधानानुसार सर्व घडले असते तर आज हे प्रश्न निर्माणच झाले नसते असेही भागवत म्हणाले. या मुद्यावर सतत आंदोलनं होू नयेत यासाठी सरकारनेही संवेदनशील भूमिका ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.