शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० कुटूंबांना जगण्याच्या लढाईत बळ देणार सुप्रियाताई साधणार दुष्काळग्रस्ताशी संवाद : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची माहिती

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़

नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़
नांदेड जिल्हा महिला आघाडीतील फेरबद्दल आणि नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीकरीता त्या नांदेडात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांमध्ये तरूण शेतकर्‍यांचे प्रमाण बरेच आहे़ अशा अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीला सासर आणि माहेरचादेखील आधार नाही़ त्यांना जीवनात उभे करण्याकरीता कायमस्वरूपी व्यवसाय, नोकरी उपलब्ध व्हावी याकरीता यशस्वीनी अभियान प्रयत्न करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले़ मराठवाड्यात ८० स्त्रीयांना त्यांच्या आवडीनूसार व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण दिले जाणार आहे़ तर त्यांच्या मुलांना शिक्षणाकरीता बारामती येथील शारदा प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात येणार आहे़ याठिकाणी राहणे, जेवन, शिक्षण सर्व सुविधा मोफत पुरविल्या जात आहेत़ तसेच काही स्त्रीयांच्या मागणीनूसार त्यांना दुग्धव्यवसायाकरीता गायी, शेळ्या दिल्या जाणार आहेत़ आगामी काळात खा़सुप्रियाताई सुळे या नांदेड जिल्हा दौरा करून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार असून जिल्‘ाच्या समन्वयाची जबाबदारी कल्पना पाटील डोंगळीकर यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाविषयी बोलतांना चित्राताई वाघ म्हणाल्या, मंदिरात जायला महिला शिल्लक रहायला पाहीजे़ आज महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतो आहे, पाण्याकरीता वणवण फिरणार्‍या महिलांच्या समस्या वेगळ्याच आहेत़ पाणी प्रश्नाला प्राधान्य देवून ग्रामीण भागातील स्त्रीयांच्या प्रश्नासाठी लढावे लागणार आहे़ पुरोगामी महाराष्ट्रात आजही सामाजिक अधिकाराकरीता स्त्रीयांना लढावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मंदिर प्रवेशास विद्यमान मुख्यमंत्र्यांचा विरोध नाही तर त्यांनी स्त्रीयांना सन्मानाने मंदिरात सोडण्याची व्यवस्था करायला हवी होती़ गृहमंत्री पद त्यांच्याकडे असतांना मंदिर प्रवेश करतांना स्त्रीयांना धक्काबुक्की होती, ही बाब लाजीरवाणी आहे़
पत्रपरिषदेअगोदर झालेल्या बैठकीत चित्राताई वाघ यांच्या हस्ते प्रदेश चिटणीस कल्पना पाटील डोंगळीकर, नुतन शहर जिल्हाध्यक्षा कृष्णा मंगनाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रांजली रावनगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले़ यावेळी बापुसाहेब गोरठेकर, डॉ़सुुनील कदम, शिला कदम, रामनारायण बंग, जीवन पाटील घोगरे, सविता कंठेवाड, गणेश तादलापूरकर, सारिका बच्चेवार, रितू कोलंबीकर आदी उपस्थित होते़