शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:44 IST

National Herald Case: आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी झाली.

National Herald Case: दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात बुधवारी नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी झाली. या दरम्यान ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी दावा केला की, काँग्रेसला असोसिएटेड जर्नल्सची(AJL) संपत्ती लाटायची होती. काँग्रेस नेते सोनिया आणि राहुल गांधी यांनीच ही २००० कोटींची मालमत्ता लाटण्याचे षडयंत्र रचले होते. या हाय-प्रोफाइल प्रकरणाची सुनावणी सीबीआयचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर होत आहे. 

एजीएल नॅशनल हेराल्ड नावाचे वृत्तपत्र प्रकाशित करत असे. याची स्थापना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरी यांनी केली होती. आज सुनावणीदरम्यान, एसव्ही राजू म्हणाले की, एजेएलच्या संचालकांनी काँग्रेसला पत्र लिहिले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की, प्रकाशन बंद झाल्यामुळे आणि नियमित उत्पन्नाच्या अभावामुळे ते कर्ज फेडू शकत नाहीत. दरम्यान, यंग इंडियनने सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे त्याचे मालक असल्याचे घोषित केले होते. सोनिया गांधी, राहुल गांधी, सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांनी यंग इंडियनमध्ये महत्त्वाची पदे भूषवली.

राहुल-सोनिया यांनी २००० कोटी रुपयांची फसवणूक केली- ईडीएसव्ही राजू पुढे म्हणाले की, २००० कोटी रुपयांची मालमत्ता असलेली एजेएल ही कंपनी ९० कोटी रुपयांच्या कर्जासाठी विकत घेण्यात आली होती. ही फसवणूक आहे. हा खरा व्यवहार नव्हता. एजेएल काँग्रेसने नाही तर यंग इंडियनने विकत घेतले होते. ते एक षड्यंत्र होते. काँग्रेसने त्याची गॅरंटी घेतली नाही. 

९० कोटी रुपयांचे कर्ज फक्त ५० लाख रुपयांना विकल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, एक गुन्हेगारी षड्यंत्र होते, ज्यामध्ये यंग इंडियनची बनावट कंपनी म्हणून निर्मिती करण्यात आली, जेणेकरून सार्वजनिक पैशाचा वापर वैयक्तिक वापरासाठी करता येईल, असा युक्तीवाद त्यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसचे म्हणणे आहे की, यंग इंडियन ही एक नफा न मिळवणारी कंपनी असून, कोणताही वैयक्तिक फायदा घेण्यात आला नाही. आता ८ जुलैपर्यंत या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार असून, दोन्ही पक्षाकडून त्यांचे युक्तिवाद ऐकले जातील.

काय आहे प्रकरण?नॅशनल हेरॉल्डची स्थापना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ मध्ये केली होती. ते काँग्रेसचे मुखपत्र मानले जात होते. २००८ मध्ये कर्जामुळे याचे काम बंद झाले. २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये काँग्रेस नेतृत्वाने यंग इंडियन लिमिटेड कंपनीद्वारे एजेएलची मालमत्ता फसवणूकीने मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने त्याची चौकशी सुरू केली.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालयBJPभाजपा