शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

२००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 22:57 IST

Narendra Modi News: २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन यांना दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे. तसेच गोध्रा येथे घडलेली घटना भयंकर होती. तिथे लोकांना जिवंत जाळलं गेलं. त्यानंतर गुजरातमध्ये दंगे भडकले, असं विधान केलं.

२००२ साली गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठी दंगल भडकली होती. तसेच या दंगलीत हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. गोध्रा हत्याकांड आणि गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या कटू आठवणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही गुजरात दंगलींसारख्या ज्या मागच्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्याआधीच्या १२ ते १५ महिन्यांच्या कालावधीत काय काय घडलं याचं चित्र मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीचा तुम्हाला अंदाज येईल. उदाहरण घ्यायचं झाल्यास २४ डिसेंबर १९९९ रोजी  काठमांडू येथून दिल्लीला येणाऱ्या भारतीय विमानाचं अपहरण झालं होतं. तसेच अपहरणकर्ते या विमानाला अफगाणिस्तानमधील कंधार येथे घेऊन गेले होते. शकडो भारतीय ओलीस धरले गेले होते. त्यावरून संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण होतं. प्रवाशांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता.

त्यानंतर २००० साली दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त करून हजारो लोकांचा बळी घेतला होता. ऑक्टोबर २००१ मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर तर १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यांमागे असलेल्या लोकांची मानसिकता एकसारखी होती. ८ ते १० महिन्यांच्या अंतराने ह्या घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत ७ ऑक्टोबर २००१ रोजी मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं, असंही मोदींनी सांगितलं.

गोध्रा हत्याकांडा आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, २४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो. जनतेचा प्रतिनिधी बनून  मला तीन दिवस झाले होते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गुजरातच्या विधानसभेत बसलो होतो. त्याचवेळी अचानक गोध्रा येथे झालेल्या हत्याकांडाची माहिती समोर आली. ही एक भयंकर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. कंधार अपहरण, संसदेवर हल्ला, एवढंच नाही तर ९/११ चा हल्ला या घटनांनंतर एवढ्या लोकांना मारणं आणि जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. त्यावेळी परिस्थिती किती तणावपूर्ण असेल, याची तुम्ही कल्पनाच करू शकता. ही बाब खरोखरच दु:खद होती. प्रत्येकजण शांतता पसंत करतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार