शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मनी पान-अर्थसंकल्प

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

व्यक्तिगत, कंपनी कराच्या दरांत सूट वाढवावी

व्यक्तिगत, कंपनी कराच्या दरांत सूट वाढवावी
अर्थसंकल्पाकडून अपेक्षा : उद्योग मंडळाने केल्या अर्थमंत्र्यांना सूचना
नवी दिल्ली : लघु आणि मध्यम उद्योगांचे प्रतिनिधित्व करणार्‍या उद्योग मंडळाने मागणी वाढण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात उपाय केले जावेत, असे म्हटले. रोजगार वाढ आणि उच्च वृद्धीसाठी व्यक्तिगत आणि कंपनी कराच्या दरांत सूट मिळण्याचे वर्तुळ विस्तारले पाहिजे, म्हणजे लोकांच्या खिशात पैसा येईल व त्यांची क्रयशक्ती वाढेल, असेही उद्योग मंडळाचे म्हणणे आहे.
२०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पासाठी केलेल्या सूचनांमध्ये उद्योग मंडळने म्हटले आहे की, बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे, कारभार करणे सोपे केले जावे व पायाभूत सोयींच्या योजनांना गती दिली जावी. उद्योग मंडळचे अध्यक्ष आलोक बी. श्रीराम यांनी येथे अर्थसंकल्पासाठी केलेल्या सूचनांसंदर्भात मंगळवारी वार्ताहरांशी बोलताना म्हटले की, गेल्या तीन वर्षांतील चलनवाढीतील चढउतार समोर ठेवून व्यक्तिगत आयकरात सूट वाढविली पाहिजे. कंपनी कराचा सध्याचा दर ३४ ऐवजी घटवून तो २५ टक्के केला पाहिजे. संस्थेने केलेल्या गुंतवणुकीवरील करामध्ये मिळणार्‍या सुटीची मर्यादा वाढविणे आणि गृहकर्जाच्या व्याजात मिळणारी सूटही वाढवून मिळायला हवी, अशीही सूचना त्यांनी केली आहे.
उद्योग मंडळाचे महासचिव सौरव संन्याल म्हणाले की, गुंतवणुकीवर मिळणार्‍या सुटीची मर्यादा दोनऐवजी तीन लाख रुपये व्हावी. सध्या अडीच लाख रुपये व्यक्तिगत आयकरमुक्त आहेत. दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत आहे, गृहकर्जावर वर्षाला दोन लाख रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त आहे. आरोग्य उपचारांचा सध्याचा वाढता खर्च विचारात घेता त्यावर मिळणार्‍या सुटीची मर्यादा सध्याच्या १५ हजारांवरून ३० हजार रुपयांपर्यंत केली जावी, असेही आलोक श्रीराम म्हणाले.
उद्योग मंडळचे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश गुप्ता यांनी रोजगार संधी निर्माण करण्यात बांधकाम क्षेत्राची मोठी भूमिका असल्याचे सांगितले. गुप्ता म्हणाले, सकल देशी उत्पादन वाढीत बांधकाम क्षेत्राचा वाटा २५ टक्के होण्याची गरज आहे. सध्या तो १६ टक्के आहे. रोजगार आणि बांधकाम क्षेत्रात सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे, म्हणून अर्थसंकल्पात त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे. देशात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचा आवाका जागतिक निकषांचा विचार करता मर्यादित आहे. त्यात सुधारणा व्हायला हवी. वर्षाला एक ते २५ कोटींची उलाढाल करणारा उद्योग सूक्ष्म, २५ ते १०० कोटींची उलाढाल करणारा लघु व १०० ते १००० कोटी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग मध्यम समजला पाहिजे, असे गुप्ता म्हणाले. एमएसएमईंना सध्याच्या सीमा शुल्क सुटीची मर्यादा वाढवायला हवी. ही मर्यादा १९९८ पासून दीड कोटी रुपयांची आहे. तेव्हापासून आतापर्यंत बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीत फार मोठा बदल झाला आहे. यामुळे ही मर्यादा १९९८ ते २०१४ मधील घाऊक मूल्य निर्देशांक वाढीनुसार करायला हवी, असे श्रीराम म्हणाले. खाद्य, खते आणि पेट्रोलियम अनुदानाबाबत विचारले असता आलोक श्रीराम म्हणाले,'अनुदानाला बंधने घातली पाहिजेत. गरजू नागरिकांच्या बँक खात्यात सरळ रोख अनुदान जमा करण्याची सध्याची व्यवस्था योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. त्याचा आवाका वाढविला पाहिजे.'
महेश गुप्ता यांनी सांगितले की, कंपनी कायद्याच्या अंमलबजावणीत एमएसएमई उद्योग आणि मोठ्या कंपन्या यांच्यात कोणताही फरक करायला नको. फरक करण्यात आल्यामुळे छोट्या कंपन्यांचे ओझे वाढले आहे. यात सुधारणा व्हावी.'
उद्योग मंडळचे उपाध्यक्ष गोपाळ जीवराजका म्हणाले, 'वीज, पाणी, रस्ते, बंदरे यांच्याशी संबंधित पायाभूत सोयी वाढविण्यावर भर द्यायला हवा. यात गुंतवणूक व्हायची गरज आहे.' जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लवकर लागू व्हायला हवा, अशी मागणी जीवराजका यांनी केली.
गुंतवणुकीबाबत बोलताना श्रीराम म्हणाले की, ही गुंतवणूक पायाभूत सुविधांवर खर्च करायला हवी. अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीचे उपक्रम वाढवून त्याला उच्च वृद्धीच्या मार्गावर आणण्याची गरज आहे. यात राजकोषीय तोटा ४.१ टक्क्यांपेक्षा थोडा जास्त होत असला तरी हरकत नाही. काळ्या पैशांबद्दल महेश गुप्ता म्हणाले की, तो संपुष्टात आला पाहिजे. परदेशातील बेहिशेबी पैसा भारतात आणण्यासाठी माफी योजना वापरायला हवी, अशी सूचनाही त्यांनी केली.