शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे पुढचे लक्ष्य यूपी, बिहार विधानसभा

By admin | Updated: November 10, 2014 03:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना लक्ष्य ठरविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना लक्ष्य ठरविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ६६ पैकी १७ म्हणजे एक चतुर्थांश मंत्री या दोन राज्यांतील आहेत. बिहारमध्ये पुढीलवर्षी तर उत्तर प्रदेशात दोन तीन वर्षांत विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आत्तापासूनच या दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.‘किमान शासन अधिकाधिक प्रशासन’ असा नारा देणाऱ्या मोदींनी नव्या विस्तारात मंत्र्यांची संख्या ६६ पर्यंत वाढविली आहे. प्रत्यक्षात ते १३-१४ मंत्र्यांना स्थान देऊ शकले असते. या विस्तारात त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक प्रतिनिधित्व दिले आहे. या राज्यातून स्वत: मोदींसह गृहमंत्री राजनाथसिंग, जलसंसाधन मंत्री उमा भारती, सूक्ष्म उद्योगमंत्री कलराज मिश्र, कृषी आणि अन्नप्रक्रिया राज्यमंत्री संजीव बाल्यान यांना स्थान आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही उत्तर प्रदेशातूनच राज्यसभेवर निवडून आणले जाईल. महेश शर्मा राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), मुख्तार अब्बास नकवी, राम शंकर कठेरिया आणि साध्वी निरंजन ज्योती यांना राज्यमंत्री बनविण्यात आले आहे. त्यापैकी तिघे ब्राह्मण, एक राजपूत, तीन मागासवर्गीय, प्रत्येकी एक जाट, मुस्लीम आणि दलित आहे. बिहारचे राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवत विस्तारात राजपूत, भूमिहार आणि यादव समुदायाला स्थान मिळाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजीवप्रताप रुडी यांना राज्यमंत्र्यांचा स्वतंत्र प्रभार मिळाला आहे. वादग्रस्त विधाने आणि आपल्या निवासस्थानावर १.१४ कोटी रुपये खर्च केल्यामुळे चर्चेत आलेले गिरीराजसिंग तसेच कधीकाळी लालूप्रसाद यादव यांचा उजवा हात राहिलेले रामकृपाल यादव यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडली. रामकृपाल यांनी लालूप्रसाद यांच्या कन्या मिसा भारती यांचा पराभव केला होता. या राज्यातून यापूर्वी कृषिमंत्री राधामोहन सिंग, कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांना स्थान दिले होते. बिहारमधील मंत्र्यांची संख्या सात झाली आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा यांच्या रूपाने झारखंडला प्रतिनिधित्व मिळाले आहे. लोकप्रिय गायक बाबुल सुप्रियो यांना राज्यमंत्री बनवत मोदींनी प.बंगाललाही स्थान दिले. ईशान्येतून आसाम आणि नागालॅडला प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या चमूची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत.