शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

हाती झाडू घेऊन मोदींचे 'स्वच्छ भारत' मिशन सुरू

By admin | Updated: October 2, 2014 13:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेऊन दिल्लीतील वाल्मिकी वस्तीची सफाई करत 'स्वच्छ भारत'मिशनचा शुभारंभ केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - राजधानी दिल्लीतील वाल्मिकी वस्तीचा परिसर आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साफ केला. गांधीजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाचा नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला. 
राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहून मोदी वाल्मिकी मंदिरात पोचले. तेथे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि हे अभियान सुरू झाले. १५ ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोदींनी या अभियानाची घोषणा करत २०१९ पर्यंत महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी 'स्वच्छ भारत मिशन' ही लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले होते. त्याअंतर्गत आज २ ऑक्टोबर रोजी देशभरात कार्यरत असलेले केंद्र सरकारचे ३१ लाख कर्मचारी विविध सार्वजनिक समारंभांमध्ये स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या लक्षावधी कर्मचारीही या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी होणार आहेत.तसेच राष्ट्रपती भवनातील सर्व कर्मचारी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सामील होणार असून ते संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसराची स्वच्छता करतील. 
दरम्यान या अभियानाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इंडिया गेटे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
काय म्हणाले मोदी?
आज महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री या दोघांची जयंती आहे. शास्त्रीजींच्या 'जय जवान, जय किसान' या घोषणेला सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत देशातील शेतक-यांनी धान्याची कोठारं भरली होती. शास्त्रीजींप्रमाणेच गांधीजींनीही 'क्विट इंडिया, क्लिन इंडिया' हे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले असले तरीही 'स्वच्छ भारताचे' स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आता आपण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प करूया. देश स्वच्छ ठेवणे हे फक्त सफाई कर्मचा-यांचे काम नाहीये. देशातील सव्वाशे कोटी जनता हे भारतमातेचे सुपूत्र असून देश स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मीसुद्धा प्रथम या देशाचा पुत्र आहे आणि नंतर पंतप्रधान. त्यामुळे देश स्वच्छ राखण्याची मी आजपासून शपथ घेतो, त्याची सुरूवात मी माझं घर, गल्ली आणि गावापासून करणार आहे.  
अस्वच्छतेमुळे आजार पसरतात आणि त्यानंतर औषधोपचारांसाठी लोकांचे खूप पैसे खर्च होतात, गरिबांना तर ते परवडतही नाही. जर देश स्वच्छ ठेवला तर आपण लोकांचे सहा हजार रुपये वाचवू शकतो. सर्व देशवासियांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. 
आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून नऊ लोकांना आमंत्रण पाठवून त्यांना सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्यास सांगितले आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता सलमान खान, कमल हसन, प्रियांका चोप्रा, तारक मेहता मालिकेची संपूर्ण टीम, अनिल अंबानी, योगगुरू बाबा रामदेव, काँग्रेस नेते शशी थरूर, मृदुला सिन्हा यांचा समावेश असून त्यांनी आणखी नऊ लोकांना आमंत्रि करावे असे आवाहनही केले आहे. 'एक कदम स्वच्छता की ओर' हा नवा नारा असून आपण स्वच्छ भारतासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि सोशल साईटवरही अभियान करणार आहोत. त्यानंतर 'मी कचरा करणार नाही, इतरांना कचरा करू देणार नाही' अशी स्वच्छतेची शपथ मोदींनी विद्यार्थ्यांसिहत सर्व उपस्थितांना दिली. 
 
मोदींचे अभियान कौतुकास्पद, सर्वांनी सहभागी व्हावे- आमिर खान
नरेंद्र मोदींचे 'स्वच्छ भारता'चे हे अभियान कौतुकास्पद असून सर्वांनी या अभियानात सहभागी व्हायला हवे असे मत अभिनेता आमिर खानने व्यक्त केले. मी घरात नेहमी स्वत: साफसफाई करतो. माझ्या कार्यालयातही आम्ही ओल्या कच-याचे खत बनलतो. साफसफाईमुळे परिसतर स्वच्छ राहतो, ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. या अभियानात सहभागी होऊन सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे असे मी आवाहन करतो.