शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित, सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:49 IST

राज्य विधानसभेचे सभापती एन. जी. प्रजापती यांनी राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या फैलावाबद्दल काळजी व्यक्त केल्यावर सभागृहाचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब केले.

भोपाळ : संकटात सापडलेल्या मध्यप्रदेशच्या कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला २६ मार्चपर्यंत मोठा दिलासा सोमवारी मिळाला. राज्य विधानसभेचे सभापती एन. जी. प्रजापती यांनी राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या फैलावाबद्दल काळजी व्यक्त केल्यावर सभागृहाचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब केले.राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ यांना सभागृहात विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश शनिवारी दिला होता. सकाळी ११ वाजता वंदे मातरम म्हणून कामकाजाला सुरुवात होताच राज्यपालांनी रुढीप्रमाणे सभागृहाला उद्देशून भाषण सुरू केले. ते फार झाले तर दोन मिनिटे बोलले. संपूर्ण भाषणही त्यांनी वाचून दाखवले नाही व ते सभापती प्रजापती यांच्यासोबत निघून गेले. टंडन यांनी भाषण संपवताच भाजपच्या सदस्यांनी विश्वासदर्शक मांडा अशी जोरदार मागणी केली. काँग्रेसच्या २२ आमदारांनी पक्षाचाच राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांना राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव संमत करून घ्या, असा आदेश १४ मार्च रोजी दिला होता.काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या कैदेत -कमलनाथभाजपने काँग्रेसच्या काही आमदारांना कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ‘कैदेत’ ठेवल्यामुळे विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडणे ‘लोकशाहीविरोधी’ व ‘घटनेविरोधी’ ठरेल, असे कमलनाथ यांनी सोमवारी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले.कमलनाथ यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘‘१३ मार्च रोजी मी आपली भेट घेऊन भाजपने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने काँग्रेसच्या अनेक आमदारांना कैदेत ठेवले असून, त्यांना वेगवेगळी विधाने करण्यास भाग पाडले जात आहे, असे सांगितलेहोते.या परिस्थितीत सभागृहात कोणतीही चाचणी घेणे अर्थहीन असून ते लोकशाहीविरोधी व घटनेच्या विरोधात ठरेल, हे मी स्पष्ट करू इच्छितो.’’बहुमत मंगळवारीचसिद्ध करा -टंडनभोपाळ : मुख्यमंत्री कमल नाथ यांना राज्यपाल लालजी टंडन यांनी १७ मार्च रोजी (मंगळवार) विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवण्यास सोमवारी सांगितले. आधी सोमवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते परंतु, सभागृह २६ मार्चपर्यंत तहकूब झाल्यामुळे ते झाले नाही.अविश्वास प्रस्ताव आणाच -कमलनाथविधानसभा तहकूब होऊन दिलासा मिळताच कमलनाथ यांनी भाजपला माझ्या सरकारवर अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडूनच दाखवा, असे आव्हान दिले. काँग्रेस सरकारकडे बहुमत नाही ते त्याने सभागृहात सिद्ध करून दाखवावे, असा दावा जर भाजपचा असेल तर मी म्हणेन की, आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे भाजपने माझ्या सरकारवर अविश्वास प्रस्ताव मांडून दाखवावा.अविश्वास प्रस्ताव आणायला ते का दोन पावले मागे आहेत. आम्ही आमचे बहुमत सिद्ध करून दाखवू, असे नाथ विधानसभेपाशी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.भाजपची मागणी : विधानसभा २६ मार्चपर्यंत तहकूब झाल्यानंतर लगेचच भाजपच्या एकूण १०६ आमदारांनी राज्यपाल लालजी टंडन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तात्काळ विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला जावा, अशी मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी विधानसभेत भाजपला बहुमत असल्याचा दावा केला. भाजपचे सभागृहात १०७ आमदार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणीकमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सुनावणी घेणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी ही याचिका केली. याचिकेत म्हटले आहे की, ‘विधानसभेचे सभापती, मुख्यमंत्री आणि विधानसभेचे प्रधान सचिव यांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यापासून तसेच राज्यपालांनी जारी केलेल्या आदेशापासून १२ तासांच्या आत विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्याचा आदेश द्यावा.’

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा