शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Lokmat National Conclave: "काँग्रेसने भारताला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवलं होतं’’, सुधांशू त्रिवेदींचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:14 IST

Lokmat Parliamentary Awards : आज  दिल्लीमध्ये सुरू असलेल्या लोकमत नॅशनल कॉनक्लेव्हमध्ये सहभागी झालेले भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी हिंदू धर्म आणि सेक्युलॅरिझरम या विषयांवर आपलं मत मांडताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

आज  दिल्लीमध्ये सुरू असलेल्या लोकमत नॅशनल कॉनक्लेव्हमध्ये सहभागी झालेले भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी हिंदू धर्म आणि सेक्युलॅरिझरम या विषयांवर आपलं मत मांडताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तसेच काँग्रेसनं देशाला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवून ठेवलं होतं, होतं असा आरोप केला. 

सुधांशू त्रिवेदी यांना हिंदू राष्ट्राच्या कल्पनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमचं सरकार आल्यापासून आम्ही या देशाला खऱ्या अर्थाने सेक्युलर देश बनवण्याचा प्रयत्न केला. याआधी काँग्रेसने आपल्या या देशाला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवून ठेवलं होता. माझ्या  या बोलण्यावर जर कुणाला आक्षेप असेल तर त्यांनी पुरावे आणून द्यावेत. मला जगातील एक सेक्युलर देश दाखवा जिथे शरिया आणि सर्वोच्च न्यायालयात मदभेद झाले तर देशातील सत्ताधारी पक्ष संसदेत कायदा करून घटना बदलून शरियाला सर्वोच्च न्यायालयाला श्रेष्ठ ठरवतो. असा एक सेक्युलर देश दाखवा जिथे ट्रिपल तलाक, हलाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असतो, असा सवाल त्यांनी विचारला.

यावेळी सुधांशू त्रिवेदी यांनी कुंभमेळ्याचं उदाहरण देऊन, हिंदू धर्माची सर्वसमावेशकता अधोरेखित केली. ते म्हणाले की, कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात हजारो परकीय पर्यटक येतात. कुठल्या अन्य धर्माच्या कार्यक्रमात इतर धर्माचे लोक जातात का. पण कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कुणाला हिंदू व्हा, म्हणून सांगितलं जातं का? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे, असे ते म्हणाले. 

ते म्हणाले की, भारत हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे जगातील सर्व धर्म नांदतात. पारशी धर्म त्याच्या उगमस्थानी संपला पण भारतात तो अस्तित्वात आहे. आज या धर्मातील अनेक लोक उद्योगपती आहेत. ज्यू लोकांवर जगात सगळीकडे अत्याचार झाले मात्र भारतात तसं झालं नाही. . इस्लाममध्ये ७२ फिरके आहेत. काही आहेत काही येतील, हे सर्व भारतात आहेत. तरीही या हिंदू संस्कृतीला सांप्रदायिक म्हणून अपमानित केलं जातं, ज्या संस्कृतीमुळे भारतच नाही तर इस्लाममधील बंधुभावही याच संस्कृतीमध्ये आहे. जगात भारत एकमेव देश आहे जिथे २० कोटी मुस्लिम आहेत पण मशिदीत बॉम्बस्फोट होत नाहीत. मात्र जिथे निजाम ए मुस्तफाचं राज्य येतं तिथे मशिदींमध्ये बॉम्बस्फोट होतात. 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डBJPभाजपाcongressकाँग्रेस