शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:32 IST

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या विकासासाठी कायमस्वरूपी सरकार आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या विकासासाठी कायमस्वरूपी सरकार आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेव्हा-जेव्हा आपण विभागलो तेव्हा शत्रूचा फायदा झाला. काँग्रेसची सत्ता असती तर रोज स्फोट झाले असते, OROP लागू झाली नसती. काँग्रेसच्या राजवटीत विश्वास टिकवणे कठीण आहे. काँग्रेसने रामनवमीला बंदी घातली. कर्नाटकात हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे मारहाण करण्यात आली असं मोदींनी म्हटलं आहे. 

राजस्थानमधील टोंक येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, "मला तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि उत्साह मिळाला आहे. आज रामभक्त हनुमानजींच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे, संपूर्ण देशाला शुभेच्छा. हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा... एकता ही राजस्थानची सर्वात मोठी संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा आपली फाळणी झाली, त्याचा फायदा देशाच्या शत्रूंनी घेतला आहे. आताही राजस्थान आणि तेथील लोकांमध्ये फूट पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, राजस्थानने यापासून सावध राहण्याची गरज आहे."

"2014 मध्ये तुम्ही मोदींना दिल्लीत सेवेची संधी दिली तेव्हा देशाने असे निर्णय घेतले ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण 2014 नंतरही आणि आजही काँग्रेस दिल्लीत राहिली असती तर काय झाले असते? काँग्रेस असती तर आजही जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर दगडफेक झाली असती आणि काँग्रेस सरकारने काहीच केलं नसतं. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन लागू झाली नाही, देशाच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट होत राहिले असते. काँग्रेस असती तर भ्रष्टाचाराचे नवे मार्ग शोधले असते."

"परवा राजस्थानमध्ये मी देशासमोर काही गोष्टींचं सत्य ठेवलं आणि संपूर्ण काँग्रेस आणि इंडिया आघाडीत खळबळ उडाली. तुमची संपत्ती हिसकावून त्यांच्या खास लोकांना वाटून देण्याचे काँग्रेस एक खोल षडयंत्र रचत आहे हे सत्य मी समोर ठेवलं आहे... जेव्हा मी त्यांच्या या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा ते इतके चिडले की त्यांनी मोदींना सर्वत्र शिव्या द्यायला सुरुवात केली. मला काँग्रेसकडून जाणून घ्यायचे आहे की ते सत्याला इतके का घाबरतात? ते त्यांचे धोरण इतके का लपवतात, जेव्हा तुम्हीच पॉलिसी बनवली होती तेव्हा ते स्वीकारायला का घाबरता… हिंमत असेल तर स्वीकारा, आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत..." असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस