शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

"400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 09:12 IST

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. कानपूर लोकसभा जागेवर चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र या जागेवर भाजपामधील लढत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपाने कानपूरच्या जागेवर रमेश अवस्थी हा नवा चेहरा दिला आहे, मात्र या नावाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत कानपूरमधील भाजपाचे माजी उपाध्यक्ष, वीएचपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक, ज्येष्ठ नेते प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कानपूरमधील उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, 400 पारचा संकल्प पूर्ण करणं अवघड आहे.

कोण आहेत प्रकाश शर्मा?

कानपूरच्या दिग्गज नेत्यांमध्ये प्रकाश शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी भाजपा, वीएचपी, बजरंग दल अशा अनेक मोठ्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. शहराच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणातही त्यांचा सहभाग आहे, मात्र कानपूर मतदारसंघासाठी उमेदवार रमेश अवस्थी यांच्या निवडीबाबत आणि निवडणूक लढवल्यावर होणाऱ्या नुकसानाबाबत भाजपाने पंतप्रधानांना पत्र लिहिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. 

पंतप्रधानांना लिहिलेलं हे पत्र व्हायरल झालं असून, त्यात कानपूरची भूमी क्रांतिकारकांची भूमी असल्याचं म्हटलं आहे. "या भूमीतून जनसंघ आणि भाजपासाठी मैदान तयार करण्यात आलं आहे. येथे पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही. रमेश अवस्थी यांनी भाजपाचे सदस्यत्व कधी घेतले आणि पक्षासाठी काय योगदान दिले, याची माहितीही येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना नाही."

"कानपूरची भूमी कार्यकर्ता विरहित झाली आहे का? पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असून ते अंतर्गत धुमाकूळ घालत आहेत. असेच चालू राहिले तर पंतप्रधानजी, तुमचा 400 पारचा संकल्प अपूर्णच राहील" असं पत्रात म्हटलं आहे. कानपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार आहेत. पण, त्याआधीच या पत्रावरून वाद सुरू झाला असून भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण