शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

भाजप सोडताना अडवणींच्या डोळ्यात आश्रू; पण त्यांनी रोखले नाही : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:34 AM

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष सोडण्याचा आपला निर्णय जेंव्हा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना समजला, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते, अशी माहिती भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नवीन इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम मी अडवाणी यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी मला पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते. परंतु, त्यांनी मला रोखले नाही. ठिक आहे, आपला स्नेह कायम राहिल असंही अडवाणींनी म्हटल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली. तसेच भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना योग्य वागणूक मिळत नाही. अडवणी भाजपच्या संस्थापकांपैकी एक आहेत. मात्र भाजपने त्यांनाच तिकीट नाकरले. पक्षाने गांधीनगर येथून पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत बालाकोट एअर स्ट्राईकमुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल का, या संदर्भात सिन्हा यांना विचारण्यात आले. त्यावर सिन्हा म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्ती देशभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बेरोजगारीचा मुद्दा काढल्यास ते पुलवामाची आठवण करून देतात. जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे मोदी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे २३ मे नंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी मोदींनी 'एक्सपायरी पीएम' म्हटले आहे. ही उपाधी त्यांच्यासाठी योग्यच आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांना आपली झोळी उचलून निघावे लागणार, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी