शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

Kanhaiya Kumar: “बिहारच्या लोकांना हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावे लागते”; कन्हैय्याची नितीश सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 9:41 AM

Kanhaiya Kumar: कन्हैय्या कुमार काँग्रेसचे उमेदवार राजेश कुमार मिश्रा यांच्या प्रचारार्थ तारापूर येथे गेले होते.

पाटणा: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता तसेच अलीकडेच काँग्रेसमध्ये सामील झालेल्या कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) बिहारमध्ये दोन जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. बिहारमधील कुशेश्वरस्थान आणि तारापूर येथे पोटनिवडणुका होत आहेत. यावेळी एका प्रचारसभेला संबोधित करताना कन्हैय्या कुमारने बिहारमधील नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली असून, बिहारच्या लोकांना हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यांत जावे लागते, असा खोचक टोला लगावला आहे. 

तारापूर येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजेश कुमार मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कन्हैय्या कुमार काँग्रेसचे उमेदवार राजेश कुमार मिश्रा यांच्या प्रचारार्थ तारापूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली. कुशेश्वरस्थान आणि तारापूर या दोन्ही जागांसाठीच्या पोटनिवडणुका ३० ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 

बिहारमध्ये विस्थापितांचा खूप मोठा प्रश्न

बिहारमधील नागरिकांना नोकरी, शिक्षण, उपचार केवळ यांसाठी नव्हे तर हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावे लागते. बिहारमध्ये विस्थापितांचा प्रश्न खूप मोठा आहे. तसेच बिहारमध्ये विकास कुठेच दिसत नाही, अशी टीका कन्हैय्या कुमारने केली आहे. काँग्रेस आणि आरजेडी स्वबळावर निवडणूक लढत आहे. याबाबत बोलताना कन्हैय्या कुमारने सांगितले की, काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे. मोठ्या पक्षासाठी मन मोठे आणि खुले ठेवायला हवे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा असतो, असे कन्हैय्या कुमारने म्हटले आहे. 

दरम्यान, हल्लीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैया कुमारने भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा आणि उजवी मंडळी ज्या तुकडे-तुकडे घोषणेवरून कन्हैयावर टीका करत असे, त्याच तुकडे तुकडे घोषणेचा आधार घेत कन्हैयाने भाजपला टोला लगावला आहे. आता आम्ही भगवा पार्टीचे तुकडे तुकडे करणार असा इशारा कन्हैया कुमारने दिला. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार