शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

अपमान झाला, अवहेलना झाली, हेटाळणी झाली, पण बाबासाहेबांनी देश सोडण्याचा विचारही नाही केला

By admin | Updated: November 27, 2015 12:20 IST

उलट भारताला सशक्त बनवण्यासाठी अथक कार्य केले अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बाबासाहेबांचं केवळ कौतुक केलं नाही तर आमिर खानला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अपमान सोसला, त्यांची अवहेलना झाली, हेटाळणी झाली परंतु त्यांनी कधीही देश सोडायचा विचारही केला नाही, उलट भारताला सशक्त बनवण्यासाठी अथक कार्य केले अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बाबासाहेबांचं केवळ कौतुक केलं नाही तर आमिर खानला उल्लेख न करता टोला लगावला आहे.
राजनाथ सिंह यांनी यावेळी सेक्युलर व सोशालिस्ट हे शब्द मूळच्या प्रिएंबलमध्ये नव्हते ते नंतर घुसडण्यात आले असं सांगताना, जर हे शब्द महत्त्वाचे वाटत असते तर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुरुवातीलाच वापरले असं राजनाथ म्हणाले. मात्र, आज सेक्युलर या शब्दाचा प्रचंड गैरवापर होत असल्याचे सांगितले. विरोधकांनी यावर प्रचंड गदारोळ घातला. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तर बाबासाहेब आंबेडकर मूळचे भारतीय होते, तुम्ही आर्यन बाहेरून आलेले आहात, परके आहात असा थेट आरोप राजनाथ सिंह व भाजपावर केला.
सेक्युलर या शब्दाचा अर्थ पंथनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्ष असा असल्याचे सांगत तो त्याच अर्थी वापरायला हवा असा आग्रह राजनाथ सिंह यांनी धरला आहे.
मी बोलतोय ते अनेकांना रुचणार नाही, परंतु हे बोलणं आवश्यक असल्याचं सांगत प्रिएंबलमध्ये सेक्युलर व सोशालिस्ट शब्द घुसडण्याचा उल्लेख जाणुनबूजून केला.
 
राजनाथ सिंह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
 
- सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून पंथनिरपे७ असा आहे आणि तो याच अर्थाने वापरायला हवा असा माझा आग्रह राहील.
- पारसी व ज्यू या दोन्ही समाजांना जगभरामध्ये सन्मानानं वागवणारा व धार्मिक स्वातंत्र्य देणारा देश केवळ भारत आहे. एवढंच नाही मुस्लीमांमधील सगळेच्या सगळे समाजघटक केवळ भारतात आढळतात.
- भारतामध्ये जर कुठल्या शब्दाचा वारेमाप गैरवापर होत असेल तर तो शब्द सेक्युलर हा आहे. भारताचा परीचयच पंथनिरपेक्ष असा आहे, जो बाबासाहेबांना अभिप्रेत होता. त्यामुळे त्यांना हा शब्द प्रिएंबलमध्ये वापरण्याची गरज वाटली नाही.
- सेक्युलर व सोशालिस्ट शब्द प्रिएंबलमध्ये ४२व्या घटनादुरुस्तीमध्ये जोडण्यात आले आहेत. ते आवश्यक वाटले असते तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच हे शब्द वापरले असते.
- बाबासाहेब आंबेडकर मूल भारतीय आहेत, ते कशाला देश सोडून पळतील. तुम्ही बाहेरून आला आहात, आर्यन बाहेरून आलेत असं सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा व राजनाथ सिंह यांच्यावर हल्ला चढवला.
- घटनेमध्ये, प्रिएंबलमध्ये कुठलाही बदल करायचा नाही असं असतानाही, सेक्युलर व सोशालिस्ट हे शब्द मागाहून घालण्यात आले. यांना माझा विरोध नाही, परंतु ही बाब सगळ्यांना माहीत हवी म्हणून उल्लेख करण आवश्यक आहे.
- आरक्षण ही राजकारणाचा मुद्दा नाही, तर सामाजिक, आर्थिक समानतेसाटी बाबासाहेबांनी आरक्षण महत्त्वाचं मानलं आणि तिच्यासंदर्भात वेगळा विचार शक्य नसल्याचं आमचं मत आहे.
- अस्पृश्यतेच्या विरोधात बाबासाहेबांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं, एवढंच नाहीतर समानतेएवढं महत्त्वाचं काहीच नाही याचा पुरस्कार बाबासाहेबांनी कायम केला. त्याच उद्देशातून त्यांनी आरक्षणाचा पुरस्कार केला.
- भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था उभारण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान खूप महत्त्वाचं आहे. श्रमिक कल्याणासाठी कायदेशीर तरतुदींवर बाबासाहेबांनी काम केलं तसेच तळागाळातल्या समाजाला उपयुक्त अनेक योजनांमध्ये बाबासाहेबांच्या बुद्धीचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे.
- स्वतंत्र भारतामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं योगदानही महत्त्वाचं असून ते कुणालाही नाकारता येणार नाही.
- शेकडो संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताला वल्लभभाई पटेलांनी जोडलं असेल तर घटना समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एकत्र ठेवण्याचं अजोड काम केलंय.
- अनेकवेळा उपेक्षा झाली, अपमान सहन करायला लागला परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही देश सोडून जाण्याचा विचारदेखील केला नाही, उलट भारत सशक्त करण्याचा संकल्प केला.
- भारताला मिळालेली घटना ही अनेक दिग्गजांनी दिलेल्या योगदानाचा परिणाम आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे.