शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

देशातील निम्म्या भागावर दुष्काळाचं संकट? मोदी सरकारसमोर मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:27 PM

यंदा दुष्काळाचं संकट आणखी गहिरं होणार

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर उद्या नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींच्या या कार्यकाळात त्यांच्यासमोर अनेक आव्हानांचा डोंगर असेल. देशातील जवळपास निम्म्या भागात दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: दक्षिण भारतातदुष्काळाची दाहकता जास्त असेल असा अंदाज आहे. त्यामुळे अनेक राज्यांना केंद्राच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे. बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी गांधीनगरमधील दुष्काळाची माहिती देणाऱ्या यंत्रणेनं धोक्याचा इशारा दिला आहे. देशातील 40 टक्क्यांहून अधिक भागात दुष्काळ पडू शकतो. यापैकी निम्म्या भागातील दुष्काळाची तीव्रता गंभीर असू शकेल, अशी भीती आयआयटी गांधीनगरकडून वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे दरम्यान होणाऱ्या मान्सूनपूर्व पावसात यंदा 22 टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील दोन तृतीयांश भागात कमी किंवा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी मान्सूनपूर्व पावसाची नोंद यंदा झाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 49 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागाला दुष्काळाचा जबरदस्त फटका बसू शकतो. मान्सूनपूर्व पाऊस कमी झाल्यानं ग्रामीण भागासह शहरी भागातही पाणीसंकट तीव्र होणार आहे. पाऊस कमी झाल्यानं ऊस, भाज्या, कापूस आणि फळांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च ते 15 मे च्या दरम्यान 75.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या काळात सरासरी 96.8 मिलीमीटर इतका पाऊस होतो. त्यात यंदा घट झाली आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळIndiaभारत