शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

'...ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब', नारायणमूर्ती संतापले; नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 14:27 IST

इनफोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी भारतातील परिस्थितीवरुन खडे बोल सुनावले.

भारतीय कफ सिरप(सर्दीचे औषध)मुळे गांबियातील मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायणमूर्ती यांनी मोठे विधान केले आहे. 'भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू होणे, ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. यामुळे भारतीय फार्मा रेग्युलेटरी एजन्सीची प्रतिमा मलीन झाली,' असे विधान नारायणमूर्ती यांनी केले आहे.

भारतासाठी लाजिरवाणी बाबसोमवारी इन्फोसिस पारितोषिक 2022 समारंभातील आपल्या भाषणादरम्यान नारायण मूर्ती यांनी कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू होण्यावर चिंता व्यक्त केली. या घटनेमुळे जगभरात भारताची लाज गेली. गेल्या 20 वर्षांत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली, परंतु आजही आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, असे मत नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.

शिक्षणाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करताना नारायण मूर्ती म्हणतात की, जागतिक क्रमवारी 2022 मध्ये एकाही भारतीय शैक्षणिक संस्थेचा समावेश नाही. लस निर्मितीसाठीही इतर विकसित देशांच्या तंत्रज्ञानावर किंवा संशोधनावर अवलंबून राहावे लागते. डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांवर आजही आपण लस शोधू शकलो नाही. या आजारांना आपण गेली 70 वर्षे झुंज देत आहोत,असंही ते म्हणाले.

यशाचे दोन मूलभूत मंत्रयावेळी नारायणमूर्ती यांनी यशाचे दोन मूलभूत मंत्र दिले. ते म्हणतात की, कोणताही शोध यशस्वी होण्यासाठी पैसा ही पहिली गरज नाही. असे असते तर पूर्व युरोपातील देश गणिताच्या क्षेत्रात यशस्वी झाले नसते. संशोधनातील यशासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रथम- आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जगातील सध्याच्या समस्यांशी निगडीत असले पाहिजे. दुसरे- आपल्या संशोधकांनी वर्तमानातील समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते भविष्यातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकतील.

WHO ने अलर्ट जारी केला होतावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने 5 ऑक्टोबर 2022 रोजी एक अलर्ट जारी केला होता की, इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडने बनवलेले खोकला आणि सर्दीचे सिरप मृत्यू किंवा गंभीर मूत्रपिंडाच्या आजारासाठी जबाबदार असू शकते. रिपोर्टनुसार, या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त होते. हे दोन घटक मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. 

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिसHealthआरोग्यDeathमृत्यू