शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

'...ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब', नारायणमूर्ती संतापले; नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 14:27 IST

इनफोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी भारतातील परिस्थितीवरुन खडे बोल सुनावले.

भारतीय कफ सिरप(सर्दीचे औषध)मुळे गांबियातील मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायणमूर्ती यांनी मोठे विधान केले आहे. 'भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू होणे, ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. यामुळे भारतीय फार्मा रेग्युलेटरी एजन्सीची प्रतिमा मलीन झाली,' असे विधान नारायणमूर्ती यांनी केले आहे.

भारतासाठी लाजिरवाणी बाबसोमवारी इन्फोसिस पारितोषिक 2022 समारंभातील आपल्या भाषणादरम्यान नारायण मूर्ती यांनी कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू होण्यावर चिंता व्यक्त केली. या घटनेमुळे जगभरात भारताची लाज गेली. गेल्या 20 वर्षांत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली, परंतु आजही आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, असे मत नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.

शिक्षणाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करताना नारायण मूर्ती म्हणतात की, जागतिक क्रमवारी 2022 मध्ये एकाही भारतीय शैक्षणिक संस्थेचा समावेश नाही. लस निर्मितीसाठीही इतर विकसित देशांच्या तंत्रज्ञानावर किंवा संशोधनावर अवलंबून राहावे लागते. डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांवर आजही आपण लस शोधू शकलो नाही. या आजारांना आपण गेली 70 वर्षे झुंज देत आहोत,असंही ते म्हणाले.

यशाचे दोन मूलभूत मंत्रयावेळी नारायणमूर्ती यांनी यशाचे दोन मूलभूत मंत्र दिले. ते म्हणतात की, कोणताही शोध यशस्वी होण्यासाठी पैसा ही पहिली गरज नाही. असे असते तर पूर्व युरोपातील देश गणिताच्या क्षेत्रात यशस्वी झाले नसते. संशोधनातील यशासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रथम- आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जगातील सध्याच्या समस्यांशी निगडीत असले पाहिजे. दुसरे- आपल्या संशोधकांनी वर्तमानातील समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते भविष्यातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकतील.

WHO ने अलर्ट जारी केला होतावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने 5 ऑक्टोबर 2022 रोजी एक अलर्ट जारी केला होता की, इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडने बनवलेले खोकला आणि सर्दीचे सिरप मृत्यू किंवा गंभीर मूत्रपिंडाच्या आजारासाठी जबाबदार असू शकते. रिपोर्टनुसार, या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त होते. हे दोन घटक मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. 

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिसHealthआरोग्यDeathमृत्यू