शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरीसाठी आटापिटा

By admin | Updated: January 4, 2015 02:54 IST

पाकिस्तानी लष्कराने केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात काश्मीरमधील सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद तर एक महिला ठार झाली़

पाकिस्तानची मुजोरी कायम : उखळी तोफांचा मारा; भारतात दहशत पसरवण्याचा प्रयत्न
श्रीनगर/जम्मू / नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आखलेल्या नियोजित दौऱ्यापूर्वी भारताला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांचे नऊ गट जम्मू-काश्मीरच्या सीमेतून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत़ त्याचवेळी समुद्रमार्गे घुसखोरीचा प्रयत्न फसल्यानंतरही पाकिस्तानने शस्त्रसंधी भंगाची मुजोरी सुरूच ठेवली आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात काश्मीरमधील सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद तर एक महिला ठार झाली़ अन्य ११ गावकरी जखमी झाले़ भारतीय हद्दीत आत्मघाती स्फोटात जलसमाधी मिळालेल्या संशयास्पद बोटीबाबत हात वर करणाऱ्या पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याची माहिती आहे.
ओबामा यंदा प्रजासत्ताक दिन संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत़ गुप्तचरांच्या अहवालानुसार ओबामांच्या दौऱ्यापूर्वी दहशत निर्माण करण्याचा पाकसमर्थित अतिरेक्यांचे प्रयत्न आहेत़ प्रत्येकी चार ते पाच जणांच्या नऊ गटांत हे अतिरेकी पाकी लष्कराच्या मदतीने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत़ आठवडाभरापासून सांबा सेक्टरमध्ये सुरू असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाआडून घुसखोरांना बळ देण्याचे पाकचे प्रयत्न आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडे म्हटले होते.

च्मुजोर पाकिस्तानने आज शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधी भंग करीत, जम्मू-काश्मीरच्या कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील अनेक गावे आणि १३ सीमा चौक्यांना लक्ष्य केले़
च्उखळी तोफांच्या माऱ्यासह पाकी लष्कराने केलेल्या गोळीबारासंदर्भात भारतीय पोलीस अधिकाऱ्यांनी लष्कराने दाखल केलेल्या एफआयआरचा हवाला देत सांगितले की, पाकी सैनिकांनी गत रात्री कन्हैया चौकीनजीक नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि तंगधार भागात उखळी तोफांचा मारा केला़
च्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले तर अन्य एक जवान जखमी झाला़ आंतरराष्ट्रीय सीमेवरील कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील गावांना आणि १३ सीमा चौक्यांनाही लक्ष्य करीत, पाकने तुफान गोळीबार केला़ यात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी झाले़
च्पाकिस्तानी तोफांच्या माऱ्याने भारताच्या सीमावर्ती भागातील कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील गावांतून १४००हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे़ दोन महिन्यांपूर्वीही पाककडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये १३ जण मृत्युमुखी पडले होते़
च्सीमावर्ती भागांतील ३२ हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले होते़ भारतीय जवानांनीही पाकला ठोस प्रत्युत्तर दिले़

मैत्रीचा हात पुढे करूनही...
पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग थांबवावा़ भारत वारंवार मैत्रीचा हात पुढे करतो आणि पाकिस्तान वारंवार तोंडघशी पडूनही कुरापती करतो़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकी पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रित करून भारताने एक नवी सुरुवात केली हेती़ पण याउपरही पाक वारंवार शस्त्रसंधी भंग करीत आहे़

नौकेच्या मलब्याचा शोध
गुजरातेतील पोरबंदरच्या खोल समुद्रात भारतीय तटरक्षक दलाकडून पाठलाग सुरू असतानाच, स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेबाबतचे गूढ कायम असून, या नौकेचा मलबा शोधण्याची मोहीम तटरक्षक दलाने हाती घेतली आहे़ 

‘समजेल अशा भाषेत बोलू’
पाकचा धमकीचा स्वर
इस्लामाबाद : दोन दिवसांपूर्वी भारताकडून सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार जवान ठार झाल्याचा संदर्भ देत पाकिस्तानने शनिवारी अप्रत्यक्षपणे धमकीची भाषा वापरत ‘आता त्यांना समजेल अशा भाषेतच आम्ही त्यांच्याशी बोलू,’ असे म्हटले आहे. संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘शांतता नांदावी यासाठी गेल्या सहा महिन्यांत आम्ही भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना (भारताला) बहुधा ही भाषा समजत नसावी, असे दिसते. त्यामुळे आता भारताला कळेल अशा भाषेतच त्यांच्याशी बोलायला हवे, असे मला वाटते.’ ३१ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात गस्त घालणारा एक जवान ठार झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे चार रेंजर्स मारले गेले होते. त्याचा संदर्भ देऊन ख्वाजा आसिफ यांनी हे विधान केले.