शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

5 वर्षात 313 रेल्वे गाड्या रुळावरुन घसरुन अपघात, 419 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 12:54 PM

भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही.  शेकडो प्रवासी रेल्वे अपघतात मृत्युमुखी पडतात.

ठळक मुद्देगेल्या पाच वर्षांत रेल्वे अपघातात 419 प्रवाशांचा मृत्यूप्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही.  शेकडो प्रवासी रेल्वे अपघतात मृत्युमुखी पडतात. 2013पासून ते 2018पर्यंत एकूण 350 अपघातांमध्ये 419 प्रवाशांच्या नाहक बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.  

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे अपघातांबाबतची माहिती पुरवण्याची मागणी आरटीआयमार्फत केली होती.  रेल्वे बोर्ड विभागात 2013 पासून ते 2018 पर्यंत एकूण किती रेल्वे अपघात झाले?, अपघातात किती प्रवाशांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले? अपघातांमुळे रेल्वेला किती प्रमाणात नुकसान झाला?, ही माहिती शेख यांनी विचारली होती. यानंतर रेल्वे बोर्डाचे  जनमाहिती अधिकारी तथा उप निदेशक/संरक्षा संजोय अब्राहम यांनी  शकील अहमद शेख यांना सर्व माहिती उपलब्ध करुन दिली. 

मिळालेल्या माहितीमध्ये धक्कादायक आकडे समोर आले आहेत. आरटीआयनुसार, एप्रिल 2013 पासून मार्च 2018 पर्यंत एकूण 350 रेल्वे अपघात झाले. यामध्ये 419 प्रवाशांचा बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे रेल्वेला तब्बल 282 कोटी 78 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातांमध्ये लोकल रूळावर घसरणे, उलटणे तसंच आग लागणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे.  

2013-2014 एकूण 64 रेल्वे अपघात, 41 प्रवाशांचा मृत्यू,  79 प्रवासी जखमी, 38 कोटी 2 लाख रुपयांचे  नुकसान 

2014-2015 एकूण 74 रेल्वे अपघात, 119 प्रवाशांचा मृत्यू, 322 प्रवासी जखमी, 72 कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान 

2015-2016 एकूण 68 रेल्वे अपघात, 36 प्रवाशांचा मृत्यू,  101 प्रवासी जखमी, 59 कोटी 24 लाख रुपयांचे नुकसान 

2016-2017एकूण 84 रेल्वे अपघात, 195 प्रवाशांचा मृत्यू,  346 प्रवासी जखमी, 62 कोटी 29 लाख रुपयांचे नुकसान 

2017-2018 एकूण 60 रेल्वे अपघात, 28 प्रवाशांचा मृत्यू, 176 प्रवासी जखमी, 51 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान 

90 टक्के अपघात गाड्या रूळावर घसरल्याने झाले आहेत. तसेच 6 टक्के अपघात गाड्यांची टक्कर, तर 4 टक्के अपघात आग लागण्याच्या घटनांमुळे झाले आहेत.  रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून शुल्क आकारत आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी उपाय का केले जात नाहीत, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू