शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बनावट कागदपत्रांच्या मदतीने रोहिंग्यांना दिलं जातंय भारतीय नागरिकत्व, घुसखोरीसाठी नेटवर्क सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 12:56 PM

बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट कागदपत्रंही उपलब्ध करुन दिली जात आहेत.

ठळक मुद्दे बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रियकोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेतभारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे

नवी दिल्ली - बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट कागदपत्रंही उपलब्ध करुन दिली जात आहेत. काही रोहिंग्यांकडे तर बनावट भारतीय कागदपत्रं उपलब्ध आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर भारतात घुसखोरी केल्यानंतर येथील मुस्लिम संघटनांनी मदत करावी यासाठी रोहिंग्या प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन कोणीही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही आणि देशाबाहेर काढणार नाही.    

गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह भारत - बांगलादेश सीमारेषा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. कोलकातामध्ये घुसखोरी करण्यासाठी मदत करणा-या दलाल आणि एजंट्सच्या मुसक्या आवळण्यावरही यावेळी चर्चा केली जाईल. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हे दलाल बांगलादेशमधून घुसखोरी करण्यासाठी रोहिंग्यांना मदत करुन त्यांना झोपडपट्टी आणि भाड्याने घरं देण्यासाठी मदत करणार आहेत. यानंतर त्यांना देशातील इतर भागांमध्ये पाठवण्यात येईल. 

गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'भारत आणि बांगलादेशदरम्यान 4 हजार किमी लांब सीमारेषा आहे. यामधील 1900 किमी सीमारेषा बंगालला जोडून आहे. याठिकाणी दोन असे क्रॉसिंग पॉईंट्स आहेत जिथून घुसखोरी केली जाते. आणि यासाठी स्थानिक एजंट्स मदत करतात. स्थानिक पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणं गरजेचं आहे, कारण रोहिंग्या भविष्यात धोका ठरू शकतात. राजनाथ सिंह भारत-बांगलादेश बॉर्डर बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहेत'.

गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार, संपुर्ण भारतात जवळपास 40 हजार रोहिंग्या बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. यामधील 7096 लोक जम्मू काश्मीर, 3059 हैदराबाद, 1114 मेवाडमध्ये, 1200 लोक पश्चिम उत्तर प्रदेश आणि 1061 लोक दिल्लीत राहत आहेत. याशिवाय केरळ आणि तामिळनाडूतही रोहिंग्या वास्तव्य करत असल्याची माहिती आहे. जम्मू, हैदराबाद आणि अंदमान निकोबार बेटावरही ते राहत असल्याची माहिती असल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे.  

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याRajnath Singhराजनाथ सिंह