शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या मदतीने रोहिंग्यांना दिलं जातंय भारतीय नागरिकत्व, घुसखोरीसाठी नेटवर्क सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:03 IST

बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट कागदपत्रंही उपलब्ध करुन दिली जात आहेत.

ठळक मुद्दे बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रियकोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेतभारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे

नवी दिल्ली - बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट कागदपत्रंही उपलब्ध करुन दिली जात आहेत. काही रोहिंग्यांकडे तर बनावट भारतीय कागदपत्रं उपलब्ध आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर भारतात घुसखोरी केल्यानंतर येथील मुस्लिम संघटनांनी मदत करावी यासाठी रोहिंग्या प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन कोणीही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही आणि देशाबाहेर काढणार नाही.    

गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह भारत - बांगलादेश सीमारेषा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. कोलकातामध्ये घुसखोरी करण्यासाठी मदत करणा-या दलाल आणि एजंट्सच्या मुसक्या आवळण्यावरही यावेळी चर्चा केली जाईल. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हे दलाल बांगलादेशमधून घुसखोरी करण्यासाठी रोहिंग्यांना मदत करुन त्यांना झोपडपट्टी आणि भाड्याने घरं देण्यासाठी मदत करणार आहेत. यानंतर त्यांना देशातील इतर भागांमध्ये पाठवण्यात येईल. 

गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'भारत आणि बांगलादेशदरम्यान 4 हजार किमी लांब सीमारेषा आहे. यामधील 1900 किमी सीमारेषा बंगालला जोडून आहे. याठिकाणी दोन असे क्रॉसिंग पॉईंट्स आहेत जिथून घुसखोरी केली जाते. आणि यासाठी स्थानिक एजंट्स मदत करतात. स्थानिक पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणं गरजेचं आहे, कारण रोहिंग्या भविष्यात धोका ठरू शकतात. राजनाथ सिंह भारत-बांगलादेश बॉर्डर बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहेत'.

गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार, संपुर्ण भारतात जवळपास 40 हजार रोहिंग्या बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. यामधील 7096 लोक जम्मू काश्मीर, 3059 हैदराबाद, 1114 मेवाडमध्ये, 1200 लोक पश्चिम उत्तर प्रदेश आणि 1061 लोक दिल्लीत राहत आहेत. याशिवाय केरळ आणि तामिळनाडूतही रोहिंग्या वास्तव्य करत असल्याची माहिती आहे. जम्मू, हैदराबाद आणि अंदमान निकोबार बेटावरही ते राहत असल्याची माहिती असल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे. 
 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याRajnath Singhराजनाथ सिंह