शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:52 AM

शस्त्रसंधी संपल्यानंतरची जवानांची पहिली धडक कारवाई

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी संपुष्टात येताच भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. शस्त्रसंधीमुळे हात बांधले गेलेल्या जवानांनी रमजान संपताच केलेल्या धडक कारवाईत चार दहशतवादी ठार झाले. शस्त्रसंधी संपल्यानंतर जवानांनी केलेली ही पहिली कारवाई आहे. याशिवाय आज सकाळी जवानांनी बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.सोमवारी सकाळी जवानांनी बांदिपुरात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. बांदिपुरात 14 जूनलादेखील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. या कारवाईत एका जवानाला वीरमरण आलं. आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांना बिजबेहारा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर या भागाला जवानांनी वेढा घातला. या भागात सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. 16 मे रोजी मोदी सरकारनं शस्त्रसंधी जाहीर करत दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवली. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र या काळात दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली. लष्कराचे जवान औरंगजेब यांचं अपहरण करुन दहशतवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. याशिवाय रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता रमजान संपल्यानं लष्करानं पुन्हा दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिकTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद