काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:03 PM2020-05-30T12:03:59+5:302020-05-30T12:05:49+5:30

कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Indian Army Eliminates two militants in Kashmir Encounter BKP | काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Next

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील वानपुरा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला आणि शोधमोहिमेस सुरुवात केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

या चकमकीत २ दहशतवादी मारले गेले. काश्मीर झोनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे आणि ते कुठल्या संघटनेशी निगडित आहेत. याती माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. ही चकमक कुलगाम जिल्ह्यातील  हांजीपोरा भागात झाली होती.  

Web Title: Indian Army Eliminates two militants in Kashmir Encounter BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.