शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Vice Admiral Anil Kumar Chawla : भारताने १९६५ सालीच आखली होती पाकिस्तानचे तुकडे करण्याची योजना, व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 7:47 AM

Vice Admiral Anil Kumar Chawla : १९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते.

बंगळुरू : पश्चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तानचे विभाजन करून १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली असली तरी त्या योजनेची आखणी भारताने १९६५ सालापासूनच केली होती, असे नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख अधिकारी व व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांनी म्हटले आहे.

१९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते. बांगलादेश निर्मितीसंदर्भातील काही कागदपत्रांचा हवाला देऊन अनिलकुमार चावला यांनी सांगितले की, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा ईशान्य भारतात हस्तक्षेप वाढला होता. या संघटनेकडून चितगावच्या डोंगराळ भागात नागा बंडखोरांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात येत असे. त्यामुळे भारताने मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.

चावला म्हणाले की, १९६९ साली काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तेव्हा इंदिरा गांधी यांना त्या पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पंतप्रधानपदी कायम राखण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते. या घडामोडींत भारताची बाजू काहीशी कमकुवत झाली होती. इंदिरा गांधी यांना विरोधक गुंगी गुडिया असे हिणवत असत. १९६९ साली पाकिस्तानमध्ये याह्याखान यांनी टिक्का खान यांच्याकडून सत्ता हिरावून घेतली. पश्चिम पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानवर वर्चस्व लादण्याचा याह्याखान यांचा प्रयत्न होता. त्यानुसार दोन्ही भागांसाठी त्यांनी १९७० साली एकत्रित सार्वत्रिक निवडणूक घेण्याची घोषणा केली.

अनिलकुमार चावला म्हणाले की, ३० जानेवारी १९७१ रोजी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेले. तिथे खरी ठिणगी पडली. १९७१च्या मार्च महिन्यात शेख मुजीबूर रहमान यांनी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली व त्यानंतर एप्रिल महिन्यात भारत पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात उतरला. त्यानंतर अशा घटना घडत गेल्या की, भारताची दुर्गामाता अशी इंदिरा गांधी यांची ओळख साऱ्या जगाला झाली. (वृत्तसंस्था)

आता युद्धाची सर्व तंत्रे बदललीव्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला म्हणाले की, युद्धनीतीच्या सर्व तत्त्वांचा अंगीकार करून १९७१च्या बांगलादेशचे युद्ध लढले गेले. आता परिस्थिती वेगळी आहे. युद्धाची सर्व तंत्रे आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलली आहेत. त्याचा विचार करून यापुढील युद्धे लढली जाणार आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत