शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश सीमा बंद करणार

By admin | Updated: March 26, 2016 01:06 IST

आसाममध्ये सत्तेवर आल्यास बांगलादेशातून होणारी स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी या देशासोबतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन भाजपने शुक्रवारी जारी केलेल्या

गुवाहाटी : आसाममध्ये सत्तेवर आल्यास बांगलादेशातून होणारी स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी या देशासोबतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन भाजपने शुक्रवारी जारी केलेल्या ‘व्हिजन डाक्युमेंट’मध्ये दिले आहे. ‘आसाम व्हिजन डाक्युमेंट २०१६-२०२५- सबका साथ सबका विकास’ येथे जारी करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यावर शरसंधान साधले.अनेक दशकांपासून बेकायदेशीररीत्या स्थलांतरित लोक आसाममध्ये वास्तव्याला असून त्यामुळे या राज्यातील लोकसंख्येचा आलेख बिघडला आहे. गोगोई हे घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप जेटली यांनी सदर जाहीरनामा जारी करताना केला.प्रथमच भाजपने आसाममधील बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नाला जाहीरनाम्यात स्थान देत प्रमुख निवडणूक मुद्यांमध्ये समाविष्ट केले आहे. उद्योग, व्यवसाय, लघु आणि मध्यम उद्योग आणि अन्य संस्थांमध्ये घुसखोरांना रोजगार देत असल्यास कठोर कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जेटलींनी स्पष्ट केले. या राज्यात ४ आणि ११ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. (वृत्तसंस्था)अमित शहा यांच्या दोन जाहीर सभा...भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसागर आणि सोनारी येथे दोन जाहीर सभांना संबोधित करताना भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन दिले. गरिबांना मदत करणारे सरकार गोगोई देऊ शकत नाहीत. केवळ भाजपच हे करू शकते. या राज्यातील जनतेने गोगोर्इंना १५ वर्षे सत्ता दिली मात्र हे राज्य जागच्या जागीच आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत हे राज्य कधीही सुरक्षित राहिले नाही, असेही शहा यांनी म्हटले.