शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पूर्व लडाख सीमेवर वाढीव लष्करी कुमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 4:59 AM

चीनच्या आक्रमकतेला जशास तसे उत्तर : ‘तो’ व्हिडीओ खरा नसल्याचाही सैन्याचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चिनी सैनिकांशी खटके उडण्याच्या ताज्या घटनांनी निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन चीनच्या आक्रमकतेला जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने वाढीव लष्करी कुमक तैनात केली आहे.

माहीतगार सूत्रांनी सांगितले की, सीमेवरील चिनी सैनिकांच्या वाढीव उपस्थितीचा समतुल्य मुकाबला करण्यासाठी आधी राखीव तुकड्यांमधील सैनिक पाठविण्याचा विचार केला गेला; परंतु नंतर नियमित लष्करी तुकड्यांसोबत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) तुकड्याही तेथे पाठविल्या गेल्या.

सूत्रांनुसार राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे ‘आयटीबीपी’च्या काही तुकड्या तैनात केल्या गेल्या होत्या. तेथील परिस्थिती आता बरीच सुधारली असल्याने त्यापैकी काही तुकड्या पूर्व तिबेटच्या सीमेवर पाठविल्या गेल्या.सीमेवरील सैन्यबळ नेमके किती वाढविले गेले आहे, हे सांगण्यास सूत्रांनी सुरक्षेच्या कारणाने नकार दिला.पूर्व लडाख सीमेवरील पँगाँग सो सरोवराच्या काठी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू असल्याचा समाजमाध्यमांत व्हायरल झालेला सुमारे अडीच मिनिटांचा कथित व्हिडिओ खरा नाही, असा खुलासा भारतीय लष्कराने केला आहे. कर्नल अमन आनंद यांनी म्हटले की, उत्तर सीमेवर अशी कोणतीही ताजी घटना घडलेली नाही.घटनादुरुस्ती विधेयकनेपाळच्या संसदेतकाठमांडू : नेपाळ सरकारने संसदेत रविवारी घटनेत दुरुस्ती करणारे विधेयक मांडले. देशाच्या नकाशात करण्यात आलेल्या बदलला या विधेयकाद्वारे मान्यता मिळवण्याचा त्यामागे उद्देश आहे. हा बदल केल्यापासून भारतासोबत सीमावाद सुरू झाला आहे.कायदा, न्याय आणि संसदीय कामकाजमंत्री शिवमाया तुंबाहंगफे यांनी सरकारच्या वतीने हे विधेयक मांडले. शनिवारी या विधेयकाला मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. घटनेत ही दुसरी दुरुस्ती असेल.नेपाळने नुकताच देशाचा सुधारित राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला. त्यात लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळचे असल्याचा दावा केला आहे. भारताने यावर संतापून प्रतिक्रिया व्यक्त केली व म्हटले की, असे कृत्रिमरीत्या वाढवलेल्या भूभागांवरील दावे कधीही स्वीकारले जाणार नाहीत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीन