शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व लडाख सीमेवर वाढीव लष्करी कुमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:59 IST

चीनच्या आक्रमकतेला जशास तसे उत्तर : ‘तो’ व्हिडीओ खरा नसल्याचाही सैन्याचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चिनी सैनिकांशी खटके उडण्याच्या ताज्या घटनांनी निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन चीनच्या आक्रमकतेला जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने वाढीव लष्करी कुमक तैनात केली आहे.

माहीतगार सूत्रांनी सांगितले की, सीमेवरील चिनी सैनिकांच्या वाढीव उपस्थितीचा समतुल्य मुकाबला करण्यासाठी आधी राखीव तुकड्यांमधील सैनिक पाठविण्याचा विचार केला गेला; परंतु नंतर नियमित लष्करी तुकड्यांसोबत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) तुकड्याही तेथे पाठविल्या गेल्या.

सूत्रांनुसार राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे ‘आयटीबीपी’च्या काही तुकड्या तैनात केल्या गेल्या होत्या. तेथील परिस्थिती आता बरीच सुधारली असल्याने त्यापैकी काही तुकड्या पूर्व तिबेटच्या सीमेवर पाठविल्या गेल्या.सीमेवरील सैन्यबळ नेमके किती वाढविले गेले आहे, हे सांगण्यास सूत्रांनी सुरक्षेच्या कारणाने नकार दिला.पूर्व लडाख सीमेवरील पँगाँग सो सरोवराच्या काठी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू असल्याचा समाजमाध्यमांत व्हायरल झालेला सुमारे अडीच मिनिटांचा कथित व्हिडिओ खरा नाही, असा खुलासा भारतीय लष्कराने केला आहे. कर्नल अमन आनंद यांनी म्हटले की, उत्तर सीमेवर अशी कोणतीही ताजी घटना घडलेली नाही.घटनादुरुस्ती विधेयकनेपाळच्या संसदेतकाठमांडू : नेपाळ सरकारने संसदेत रविवारी घटनेत दुरुस्ती करणारे विधेयक मांडले. देशाच्या नकाशात करण्यात आलेल्या बदलला या विधेयकाद्वारे मान्यता मिळवण्याचा त्यामागे उद्देश आहे. हा बदल केल्यापासून भारतासोबत सीमावाद सुरू झाला आहे.कायदा, न्याय आणि संसदीय कामकाजमंत्री शिवमाया तुंबाहंगफे यांनी सरकारच्या वतीने हे विधेयक मांडले. शनिवारी या विधेयकाला मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. घटनेत ही दुसरी दुरुस्ती असेल.नेपाळने नुकताच देशाचा सुधारित राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला. त्यात लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळचे असल्याचा दावा केला आहे. भारताने यावर संतापून प्रतिक्रिया व्यक्त केली व म्हटले की, असे कृत्रिमरीत्या वाढवलेल्या भूभागांवरील दावे कधीही स्वीकारले जाणार नाहीत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीन