शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीमुळे १०४ क्रमांकाची योजना संकटात फोन कॉलवर वाजवी दरात रक्त उपलब्ध : हॉस्पिटलचा असहाकार

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

पुणे : तातडीने रक्त हवंय.. तर १०४ या टोल फ्रि क्रमांकावर फोन करा अन वाजवी दरात रक्त मिळवा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. मात्र खाजगी हॉस्पिटलचालक व रक्तपेढयांचे यामुळे नुकसान होत असल्याने त्याव्दारे रक्त घेण्यास हॉस्पिटलकडून रक्त घेण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

पुणे : तातडीने रक्त हवंय.. तर १०४ या टोल फ्रि क्रमांकावर फोन करा अन वाजवी दरात रक्त मिळवा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. मात्र खाजगी हॉस्पिटलचालक व रक्तपेढयांचे यामुळे नुकसान होत असल्याने त्याव्दारे रक्त घेण्यास हॉस्पिटलकडून रक्त घेण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
महराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना (ब्लड ऑन कॉल) सुरू करण्यात आली. गरजू रूग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उदद्ेश आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ७ जानेवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य सेवा संचालक सतीश पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे ब्लड ऑन कॉल योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबदद्ल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'खाजगी हॉस्पिटलकडून या योजनेला सहकार्य मिळत नसल्याने त्याचा प्रतिसाद कमी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यामध्ये २०७ ठिकाणी ब्लड स्टोरेज उभारले जात आहेत. त्यापैकी १२४ ठिकाणी ते कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित ठिकाणांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे गर्भवती महिला, अपघातग्रस्त पेशंट यांना तातडीने रक्त उपलब्ध होणे सहज शक्य होणार आहे.'
१०४ क्रमांकावर दुरध्वनी केल्यानंतर संबंधित जिल्हयाच्या रक्तपेढीवर दूरध्वनी हस्तांतरीत करण्यात येतो. त्यानंतर ४० किमी किंवा एक तासाच्या अंतरावरील रूग्णालयांना शीतसाखळीतून रक्त व रक्त घटक उपलब्ध करून दिले जाते. मात्र पेशंट रक्त हवे असल्यास १०४ क्रमांकावरून रक्त मागण्यास हॉस्पिटलकडून मज्जाव केला जात आहे. हॉस्पिटलमधील रक्तपेढीतूनच रक्त घ्यावे याची जबरदस्ती पेशंवट केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

चौकट
शिशूवरील उपचारासाठी प्रगत सॉफ्टवेअर
बाळ जन्मल्यानंतर त्यामध्ये काही गंभीर आजार आढळून आले तर त्याला पुढील उपचारासाठी पाठविले जाते. मात्र बर्‍याचदा नातेवाईकांकडून उपचार केले जात नाहीत. बाळावर नातेवाईकांनी उपचार केले की नाही, त्या बाळाची स्थिती कशी आहे याबबातचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे बालमृत्यु रोखण्यात मोठी मदत होऊ शकेल अशी माहिती अतिरिक्त आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी दिली.