शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

प्रेमासाठी काय पण! तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जडला जीव; मुलासाठी घरदार सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:11 PM

Crime News : तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जीव जडल्याची अजब घटना आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांनी विरोध केल्यावर मुलासाठी या तिघींनी घरदार सोडलं आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्येही ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

चौघांच्या या हटके प्रेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना जेव्हा याबाबत कळलं तेव्हा त्यांनी याला कडाडून विरोध झाला. त्यावेळी या मुली मुलासोबत घर सोडून पळून गेल्या आहेत. बेपत्ता झालेल्या मुलींचा सध्या नातेवाईक शोध घेत आहेत. अजीमनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका गावात या घटनेने खळबळ उडाली आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वी एका गावातील तीन सख्ख्या बहिणी घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. अचानक तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक घाबरले. सुरुवातीला कोणालाही याबाबत काहीही न सांगता आधी आपल्या परिने मुलींचा शोध सुरू केला. 

तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत

नातेवाईकांकडे मुलींचा शोध घेतला. ओळखीच्या व्यक्तींकडे तपास केला, पण मुलींचा कुठेच पत्ता लागला नाही. याच दरम्यान गावात ही बातमी पसरली. बेपत्ता असलेल्या तिन्ही बहिणी या एका तरुणासोबत पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. यातील एक बहिणी ही अल्पवयीन आहे. तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. तीन बहिणी बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार कुटुंबीयांकडून अद्याप आलेली नाही. पण त्यांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस त्यांना नक्कीच मदत करतील, असं अजीमनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...अन् प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत! लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच झाडाला घेतला गळफास

राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाने लग्न करणं शक्य नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत लग्न होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकत्र गळफास घेतल्याची घटना घडली आहे. दोघांनी एकाच ओढणीने कंबरेला बांधून आणि नंतर झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. एकमेकांसोबत लग्न होऊ न शकल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस