शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांना आणखी मुदत

By admin | Updated: October 31, 2014 01:13 IST

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या फेब्रुवारीत राजीनामा देताना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती.

नवी दिल्ली : गेले पाच महिने विधानसभा निलंबनावस्थेत असलेल्या दिल्लीत सरकार स्थापन करण्याची शक्यता आजमावून पाहण्यासाठी नायब राज्यपालांनी सर्व राजकीय पक्षांशी सल्लामसलत सुरु करणो हा सकारात्मक हालचालींचा संकेत आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने यातून काही निष्पन्न होते का हे पाहण्यासाठी येत्या 11  नोव्हेंबर्पयत प्रतिक्षा करण्याचे बुधवारी ठरविले.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या फेब्रुवारीत राजीनामा देताना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. मात्र ती मान्य न करता विधानसभा प्रलंबित ठेवली गेली. याला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी केली असून न्यायालयाने दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.
गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा वृत्तपत्रंमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत सरन्यायाधीश म्हणाले की, सरकार स्थापनेची शक्यता आजमावण्यासाठी नायब राज्यपाल राजकीय पक्षांशी सल्ला मसलत करणार ही सकारात्मक बाब आहे.
 यातून काय निष्पन्न होते ते पाहू अन्यथा 11 नोव्हेंबर रोजी याचिकेची गुणवत्तेवर सुनावणी सुरु केली जाईल, असेही न्यायालयाने सूचित केले.
बहुमताचा पाठिंबा नसलेल्या पक्षाने अन्य कोणाचा तरी बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणो, असेही ठराविक परिस्थितीत घडू शकते, याकडेही न्यायमूर्तीनी लक्ष वेधले. यावर याचिकाकत्र्याचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले की, असे करणो म्हणजे दिल्लीच्या नागरिकांना प्रातिनिधिक सरकारचा हक्क नाकारण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यासारखे होईल. मात्र नायब राज्यपाल सरसार स्थापनेच्या दृष्टीने पुन्हा प्रयत्न करून पाहणार असतील तर त्यास आपली हरकत नाही. पण यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, असे ते म्हणाले.
न्यायालयाचे असेही म्हणणो होते की, राज्यपालांची शिष्टाई यशस्वी झाली नाही व सरकार स्थापनेस यश आले नाही तर ते कदाचित राष्ट्रपतींचा सल्लाही घेऊ शकतात. हे सर्व करायला त्यांना उचित कालावधी द्यायला हवा.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4नायब राज्यपाल आहे त्या विधानसभेतच सरकार स्थापण्याचे पर्याय  आजमावून पाहत असले तरी अगदीच अपरिहार्य झाले तर नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्र सरकार तीन जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल 23 डिसेंबर रोजी लागल्यानंतरच घेईल, असे कळते.
 
4या तिन्ही जागा भारतीय जनता पार्टीकडे होत्या व पोटनिवडणुकांमध्ये त्या पुन्हा जिंकण्याची पक्षास खात्री आहे. तसे झाले तर भाजपाची सदस्यसंख्या 29 वरून 32 म्हणजे स्पष्ट बहुमताहून फक्त चारनेच कमी होईल.