शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देशात भय, दबावाचे वातावरण

By admin | Updated: June 10, 2015 00:19 IST

आपल्या नेत्यांना धार्मिक तेढ निर्माण करण्याची परवानगी देऊन मोदी सरकार ‘धोकादायक दुटप्पी डाव’ खेळत आहे असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

सोनिया गांधी : काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक; मोदी सरकारवर घणाघाती हल्लानवी दिल्ली : अपयश आणि नैराश्य झटकून कामाला लागलेल्या काँगे्रसने मंगळवारी बोलवलेल्या काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या नेत्यांना धार्मिक तेढ निर्माण करण्याची परवानगी देऊन मोदी सरकार ‘धोकादायक दुटप्पी डाव’ खेळत आहे. जातीय धु्रवीकरण करण्याचे सरकारचे मनसुबे आहेत, असा आरोप सोनियांनी यावेळी केला.गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच दिल्लीत नऊ काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक दिवसीय बैठक आयोजित केली गेली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, संरक्षणमंत्री ए.के.अ‍ॅन्टोनी, पक्षाचे सरचिटणीस आणि अन्य पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.बैठकीला संबोधित करताना सोनियांनी सर्व काँग्रेसजनांना मोदी सरकारविरोधात कंबर कसून मैदानात उतरण्याचे आवाहन केले. राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री या नात्याने तुम्हाला केंद्र सरकारसोबत सहकार्याच्या भूमिकेतून काम करावे लागेल. पण एक काँग्रेसजन या नात्याने मोदी सरकारच्या चुकीच्या ध्येय-धोरणांना विरोध करणे हेही तुमचे कार्य आहे, असे त्या म्हणाल्या. भूसंपादन विधेयक आणि अन्न सुरक्षा मुद्यावर सरकारच्या भूमिकेला जोरकस विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कल्याणकारी राज्याची संकल्पना ध्वस्त करण्याचे मोदी सरकारचे सुनियोजित प्रयत्न आहेत. एकीकडे पंतप्रधान मोदी सुशासनाचा दावा करतात. घटनात्मक मूल्यांचे रक्षणकर्ते म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तर दुसरीकडे आपल्या नेत्यांना धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आणि समाजात दुफळी निर्माण करण्याची मुभा देतात. मोदी कार्यकाळात जाणीवपूर्वक भय आणि दबावाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सोनिया यावेळी म्हणाल्या. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा वारसा नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. योजना आयोग संपुष्टात आणणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत क्षेत्रास ६७ टक्क्यांवरून ४० टक्के करण्याचा प्रस्ताव तसेच शिक्षण, आरोग्य, पेयजल, स्वच्छता, रस्ते, महिला व बालविकास अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीत घट चिंताजनक असल्याचेही त्या म्हणाल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)हीच मोदी सरकारची वैशिष्ट्ये> सत्ता आणि अधिकारांचे केंद्रीकरण, संसदीय प्रक्रिया आणि नियमांचे अवमूल्यन, नागरी समाज आणि न्यायपालिकेस धमक्या ही मोदी सरकारची वैशिष्ट्ये आहेत, अशी उपहासात्मक टीका सोनिया गांधी यांनी केली.‘मार्केटिंग स्कील’चा विकास करा> आपल्या भाषणात सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्वत:मधील ‘मार्केटिंग स्कील’ विकसित करण्याचा ‘गुरुमंत्र’ दिला. आपली चांगली कामे आणि उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवा. गत निवडणुकीत आपण हेच शिकलो. वेगाने बदलत असलेल्या तांत्रिक युगात आपले म्हणणे व आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. प्रचार तंत्रावर भर देण्याची गरज आहे, असे सोनिया यावेळी म्हणाल्या.मनमोहनसिंगांनी व्यक्त केली चिंता> योजना आयोग ‘घाईघाईत’ गुंडाळून त्याजागी नीति आयोग आणण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. दुर्बल राज्ये आणि उपेक्षित भागांना मदतगार ठरणारा योजना आयोग संपुष्टात आणणे, ही माझ्यासाठी चिंतीत करणारी बाब आहे. > नीति आयोगापेक्षा योजना आयोग सरस होता. योजना आयोगाच्या माध्यमातून राज्यांचे प्रश्न, समस्या संबंधित मंत्रालयापर्यंत पोहोचत. नीति आयोगाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या विशेष दर्जा असलेल्या राज्यांसाठी कुठलेही विशेष निर्देश नाहीत,असे मला वाटते, असे मनमोहनसिंग म्हणाले. काहीतरी ‘वेगळे’ करा- राहुल> आपल्या भाषणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना काहीतरी वेगळे करण्याचा सल्ला दिला. प्रत्येक कॉंग्रेसशासीत राज्याने आपापल्या राज्यात दोन तीन परिवर्तनकारी, क्रांतिकारी योजना राबवण्यावर लक्ष केंद्रीत करून देशात सर्वाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा आणि काँग्रेसशासित नऊ राज्ये देशातील सर्वोत्कृष्ट राज्ये आहेत, हे लोकांना दाखवावे, असा सल्ला त्यांनी दिला. काँगे्रसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आपली बुद्धिमत्ता आणि अनुभवाच्या जोरावर हे करू शकतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.