शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 2:22 AM

नव्याने चर्चा करण्याची मागणी, कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या 

हरीश गुप्तानवी दिल्ली : दोन महिन्यांपासून दिल्ली सीमेवर चालू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी एकीकडे पंतप्रधान कार्यालय संबंधित मंत्रालयासोबत उसंत न घेता काम करीत असताना देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहितांच्या अमलबजावणीविरुद्ध जोरदार आवाज उठविला आहे.

शेतकरी आंदोलनामुळे सरकारच्या अन्य प्रमुख सुधारणांना खीळ बसते की काय? अशी स्थिती उद्‌भवलेली असताना १३ पैकी १० प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहिता लागू करण्यासाठी नवीन नियम निश्चित करण्याची प्रक्रिया रोखण्याची आणि द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय सल्लामसलतीच्या भावानेतून नव्याने चर्चा करण्याची मागणी केली आहे. इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सीटू, एआययूटीयूसीसह दहा कामगार संघटनांनी उपरोक्त मागणी केली आहे. केंद्रीय कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता या कामगार संहिता संसदेत मंजूर करण्यात आल्या, असा कामगार संघटनांचा आरोप आहे. या संहिता ५० कोटी श्रमशक्तींशी (कामगार, कर्मचारी) संबंधित आहेत.

कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या; परंतु, कामगार संघटना आणि सर्वसंबंधितांशी चर्चा करुन कामगार मंत्रालयाने नियम केल्यानंतरच कामगार संहितांची अमलबजावणी केली जाईल, अशी हमी देत सरकारने पेचप्रसंग टाळण्याचा प्रयत्न केला होता.  विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित भारतीय मजदूर संघाने केंद्रीय कामगार मंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन कंत्राटी कामगारांचे रक्षण करण्याची मागणी केली. कामगार संहितेतून ठेकेदारांना राज्य कामगार विमा आणि कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास बाध्य करावे. या संघटनेचाही चार कामगार संहितेमधील अनेक तरतुदींना विरोध आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी कामगार संहिता अमलबजावणीची तारीख ठरविणे लांबणीवर टाकले आहे.

कामगार संहितेचा प्रवास जानेवारी २०२१ : कामगार मंत्रालय चालू महिन्याच्या अखेरीस कामगार संहितेनुसार नियम अंतिम करणार२०१९ : औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थितीसंबंधित चार कामगार संहिता मंजूर२०१५ : कामगार मंत्रालयाने सध्याचे ४४ केंद्रीय कामगार कायदे चार संहितेत एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. नवीन कामगार संहिता मंजूर करण्यासाठी चार वर्षे लागली. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारLabourकामगार