शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

धक्कादायक! जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणत "त्याने" केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:34 PM

Farmers Protests And Suicide : कडाक्याच्या थंडीत अनेक दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत अनेक दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विष घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टिकरी बॉर्डरवर मंगळवारी एका शेतकऱ्याने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी त्याल तातडीने दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. जयभगवान राणा असं या शेतकऱ्याचं नाव असून ते हरियाणच्या रोहतकचे रहिवासी होते. ते गेल्या कित्येक दिवसांपासून ते आंदोलनात सहभागी झाले होते. विषारी पदार्थ खाल्ल्याअगोदर त्यांनी एक पत्र देखील लिहीलं आहे. जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणूनच मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं शेतकऱ्याने म्हटलं आहे. 

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शेतकऱ्याला उलटी झाली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याने एक पत्र देखील लिहिलं आहे. ज्यामध्ये त्याने शेतकऱ्यांचा हा प्रश्न कसा सोडवायचा हे देखील सांगितलं आहे. "देशातील सर्व राज्यातून दोन-दोन शेतकरी नेत्यांना दिल्लीला बोलवा आणि सरकारसोबत आणि मीडियासमोर सर्व शेतकरी नेत्यांना विचारा की ते कृषी कायद्याच्या का विरोधात आहेत. जर कायद्याविरोधात जास्त राज्य असतील तर सरकारने कायदा मागे घ्यावा. मात्र जर कायद्यासाठी जास्त राज्य असतील तर शेतकऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी आंदोलन संपवावं आणि घरी जावं" असं शेतकऱ्याने पत्रात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

...म्हणून "या" गावात BJP आणि JJP नेत्यांना नो एंट्री, शेतकऱ्यांनी लावले बॅनर

एका गावात बीजेपी आणि जेजेपी नेत्यांना नो एंट्री आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील कनीपला गावात जननायक जनता पार्टी (JJP) आणि भारतीय जनता पार्टीसाठी (BJP) बॅनर लावण्यात आले आहेत. जेजेपी आणि बीजेपी नेत्यांनी गावात येऊ नये असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. जर नेते या गावात आले, तर त्यांच्या परिस्थितीसाठी ते स्वत: जबाबदार असल्याचं देखील म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही पार्टीचा नेता असेल आणि जर तो शेतकऱ्यांना विरोध करत असेल तर त्याला गावात येऊ देणार नाही असं म्हटलं आहे. शेतकरी नेत्यांवर नाराज असल्याने त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्याdelhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप