शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: कृषीकायदे रद्द न केल्यास संसदेलाच घेराव घालू; ४० लाख ट्रॅक्टर रस्त्यावर येतील - राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 06:44 IST

Farmers Protest: दिल्लीच्या सीमांवरील रॅलीमध्ये चार लाख ट्रॅक्टर सहभागी झाले होते.

सिकर (राजस्थान) : कृषी कायदे रद्द करायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी चलो दिल्लीचा नारा दिला जाईल. त्यावेळी देशातील लाखो शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीत येतील आणि संसदेला घेराव घालतील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी राजस्थानातील शेतकरी महापंचायतीमध्ये दिला.

दिल्लीच्या सीमांवरील रॅलीमध्ये चार लाख ट्रॅक्टर सहभागी झाले होते. आता शेतकरी व ट्रॅक्टर शेतांमध्ये आहेत. त्यामुळे सीमांवर संख्या कमी दिसत आहे. पण शेतकरी रस्त्यावर उतरतील, तेव्हा सोबत ४० लाख ट्रॅक्टर पाहायला मिळतील, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, २३ मार्चपासून उपोषण आणि संसदेला घेराव हाच आमच्या पुढील आंदोलनाचा भाग असेल.

शेतकरी यापुढे इंडिया गेटपाशीच शेतीसाठी पेरणी सुरू करतील.  संसदेला घेराव कधी घालायचा, हा निर्णय सर्व शेतकरी संघटनांच्या बैठकीत घेतला जाईल, असे सांगून ते म्हणाले की, शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे केवळ नाटक केंद्र सरकार करीत आहे. चर्चेला ज्या मंत्र्यांना पाठविण्यात येत होते, त्यांना कसलेच अधिकार देण्यात आले नव्हते. 

... तर सरकारच कोसळेल

यापुढे उत्तर प्रदेशबरोबरच सर्व राज्यांमध्ये शेतकरी पंचायती व मेळावे घेण्यात येतील. देशात सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यात येईल, असा इशारा नरैश टिकैत यांनी उत्तर प्रदेशातील एका सभेत बुधवारी दिला. शेतकरी रस्त्यावर उतरले, तर सरकारच कोसळेल, असा इशारा याआधी राकेश टिकैत यांनी दिला होता.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतNarendra Modiनरेंद्र मोदी