शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

शेतकऱ्यांचा एल्गार! २९ नोव्हेंबरला १ हजार ट्रॅक्टर्स घेऊन संसदेवर कूच करणार, शेतकऱ्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 8:02 PM

शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील संसद भवनाच्या दिशेनं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील संसद भवनाच्या दिशेनं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलक गाजीपूर आणि टिकरी सीमेवरुन प्रत्येकी ५०० ट्रक्टर्ससह संसद भवनाच्या दिशेनं रवाना होतील. संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) ९ सदस्यीय समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे. 

सोनीपतच्या कुंडली सीमेजवळ संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत संसद भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २६ नोव्हेंबरपासून आंदोलकांच्या संख्येत वाढ करण्यात येईल आणि २९ नोव्हेंबर रोजी टिकरी व गाजीपूर सीमेवरुन आंदोलनाला सुरुवात होईल. दोन्ही सीमांवरुन प्रत्येकी ५०० असे एकूण १००० ट्रॅक्टर्स संसद भवानाच्या दिशेनं कूच करतील. याशिवाय पोलिसांकडून ज्या ठिकाणी अडवण्यात येईल त्याच ठिकाणी ठाण मांडून आंदोलन सुरू ठेवलं जाईल, असा निर्णय शेतकऱ्यांनी बैठकीत घेतला आहे. 

बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडले गुरनाम सिंग चढूनीसंयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीबाबत माहिती देताना शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. २९ नोव्हेंबर रोजी टिकरी आणि गाजीपूर सीमेवरुन शेतकरी ट्रॅक्टर्ससह संसद भवनाच्या दिशेनं निघतील. शेतकऱ्यांना ज्याठिकाणी पोलिसांकडून अडवलं जाईल त्याच ठिकाणी रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलन सुरु ठेवलं जाईल असं ठरविण्यात आलं. याच बैठकीत शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी मात्र नाराज होऊन बाहेर पडले. यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली