शेतकरी दुहेरी संकटात

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:20+5:302015-08-27T23:45:20+5:30

शेतकरी दुहेरी संकटात

Farmers are in double trouble | शेतकरी दुहेरी संकटात

शेतकरी दुहेरी संकटात

तकरी दुहेरी संकटात
पाऊस नाही : पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
कुरूळी : येथील मोई, निघोजे, चिंबळी परिसरातील सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे़
खेड तालुक्यातील सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून पाने खाणार्‍या आळीने पीक फस्त केले आहे. या वर्षी भुईमूग, तूर, उडीद, मूग, चवळी कडधान्य सुकू लागली तर भात पीक पाण्याअभावी हातातून जाऊ लागले आहे.

कोट
शेतकरी मित्रांनी पाने खाणारी आळी असणार्‍या पिकावर क्लोरोपायरी फॉस २० टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे किंवा विवनॉलफॉस२० टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, या मुळे किड आटोक्यात येईल.
- वसंतराव खंडागळे, चाकण कृषी मंडल अधिकारी

फोटो : मोई,निघोजे, चिंबळी परिसरातील सोयाबीन पिकावर रोगाचा झालेला प्रादुर्भाव.

Web Title: Farmers are in double trouble