शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'कृषी कायदे मागे घ्या, MSP वर लेखी हमी द्या...', केंद्र सरकारसमोर शेतकऱ्यांनी ठेवल्या 'या' ७ मागण्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 4:59 PM

FarmersProtest : जर सरकारने दोन दिवसांत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही तर दिल्लीतील सर्व ट्रक व टॅक्सी थांबवल्या जातील, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे शेतकरी प्रश्नांवर चर्चा करीत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता इतर राज्यांकडूनही पाठिंबा मिळू लागला आहे.

अशा परिस्थितीत केंद्र सरकार आता शेतकरी संघटनांशी बोलून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारसोबत होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर लेखी स्वरूपात ठेवल्या आहेत, त्यावरून त्यांना कोणत्याही प्रकारे लेखी हमी हवी आहे.

गेल्या एक आठवड्यापासून दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकरी आंदोलन तीव्र होत आहे. दिल्लीमध्ये जाण्यासाठी हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत अनेक संघटना सुद्धा सामील झाल्या आहेत. जर सरकारने दोन दिवसांत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही तर दिल्लीतील सर्व ट्रक व टॅक्सी थांबवल्या जातील, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकरी संघटनांनी सरकारसमोर कोणत्या 7 मागण्या मांडल्या आहेत, ते पाहूया...>> तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत.>> वायू प्रदूषण कायद्यात पुन्हा बदल व्हावा.>> वीजबिलाच्या कायद्यात बदल आहे, तो चुकीचा आहे.>> MSP वर लेखी हमी द्या.>>शेती करारावर (कॉन्ट्रैक्ट फार्मिंग) शेतकऱ्यांचा आक्षेप.>>  शेतकऱ्यांनी अशा विधेयकाची मागणी केली नाही, तर ते का आणले?>> डिझेलची किंमत निम्मी करा.

दरम्यान, एकीकडे दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे शेतकरी प्रश्नांवर चर्चा करीत आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपagricultureशेती