शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
3
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
4
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
5
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
6
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
7
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
8
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
9
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
10
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
11
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
12
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
13
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
14
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
15
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
16
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
17
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
18
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
19
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
20
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेले तरीही गर्दी हटेना, जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना जमेना; भाविकांचा ओघ थांबता थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 09:18 IST

या अव्यवस्थेची जबाबदारी अखेर कुणाची?

नवी दिल्ली : शनिवारी रात्री दिल्ली स्टेशनवर शेकडो भाविक प्रयागराज रेल्वेची वाट पाहत उभे असताना गाडीचा फलाट बदलल्याच्या उद्घोषणेमुळे घात झाला आणि पळापळीत १८ जणांचे जीव गेले. फलाट बदलाचे कारण जीवघेणे ठरले आहे.

चेंगराचेंगरीच्या एका दिवसानंतर, हजारो प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. योग्य नियोजन नसल्याने महाकुंभला जाणारे भाविक स्टेशनवर ताटकळत उभे होते. अतिरिक्त उपाय करूनही भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यापैकी बहुतेक महाकुंभ यात्रेकरू प्रयागराजला जात आहेत. जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे.

फाटलेल्या बॅगांचे साक्षीदार

फलाट १४ आणि १५ एका भयंकर घटनेचे साक्षीदार ठरले. या फलाटांवर विखुरलेल्या चपला-बूट, फाटलेल्या बॅगा, खाण्याचे पदार्थ यांचा खच पाहणाऱ्यांचे मन हेलावून गेले होते. हे साहित्य रविवारी सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांनी हलवले, परंतु या घटनेने प्रत्येकाच्या मनात कोरलेल्या भयंकर खुणा कधीच न मिटणाऱ्या ठरल्या.

पत्नी, मुलगी ठार, पण...

राजकुमार मांझीने त्याच्यावर कोसळलेल्या दु:खाची आपबीती सांगितली. राजकुमारची पत्नी आणि मुलगी या चेंगराचेंगरीत मारली गेली. मुलगा वाचला खरा, परंतु तो रविवारी उशिरापर्यंत सापडला नव्हता.

लोकांचा गेल्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येदिवशी महाकुंभच्या संगम भागात चेंगराचेंगरीत  मृत्यू, ६० जखमी. गेल्या वर्षी जुलैमध्ये उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये स्वयंभू भोलेबाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

ताशी १५०० तिकिटे

एकिकडे विलंबाने धावणाऱ्या रेल्वे आणि दुसरीकडे सामान्य श्रेणीतील डब्यांसाठी ताशी १५०० तिकिटांची विक्री, यामुळे दिल्ली स्टेशनवर गर्दी वाढत राहिली. आता चुकले कुठे याचा अधिकारी शोध घेत आहेत.

इकडे राजकारण तापले

राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते : प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या पाहता योग्य नियोजन करायला हवे होते. या घटनेने पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आली.

मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस अध्यक्ष : चेंगराचेंगरीची घटना रेल्वे विभागाचे अपयश आणि सरकारच्या असंवेदनशीलतेची साक्ष आहे. सरकार सत्य दडवू पाहत आहे.

लालुप्रसाद यादव, राजद प्रमुख : दिल्ली स्टेशनवरील घटनेला सर्वस्वी रेल्वे विभागच जबाबदार आहे.

अखिलेश यादव, सपा प्रमुख : सुनियोजित व्यवस्थेच्या अभावामुळे अशा दुर्घटना होत आहेत.

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीrailwayरेल्वे