शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

देशाची आयटी राजधानी बंगळुरुमध्ये संचारबंदी

By admin | Updated: September 13, 2016 13:00 IST

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १२ - कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे. देशातील आयटी उद्योगाची राजधानी अशी ओळख असलेल्या बंगळुरुच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
 
सोमवारी रात्री १०.३० नंतर बंगळुरुमध्ये कुठेही हिंसाचार झालेला नाही अशी माहिती बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांनी दिली. बंगळुरुच्या राजगोपालनगरमध्ये पोलिसांना निदर्शकांवर गोळीबार करावा लागला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मालमत्तेची नासधूर, तोडफोड प्रकरणी आतापर्यंत ३०० जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
पोलिसांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बंगळुरुमध्ये अनेक ठिकाणी तामिळनाडू रजिस्ट्रेशनची वाहने पेटवून देण्यात आली. दुकाने, बसेस जाळण्यात आल्या. 
 
कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्य सरकारने संपूर्ण बंगळुरुमध्ये १५ हजार पोलिस तैनात केले आहेत. यामध्ये दंगलनियंत्रण पथकाचाही समावेश आहे. ईदची सुट्टी असल्याने रस्ते ओस पडले असून, शाळा महाविद्यालये आणि कार्यालये बंद आहेत.