शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

coronavirus: लॉकडाऊनमुळे तीन दिवसांपासून ३ बहिणी उपाशी, पंतप्रधान कार्यालयात फोन केला अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 12:13 PM

पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली

पाटणा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरिब आणि मजूर वर्गाला बसला आहे. लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्याकडील कामगारवर्गाला कमी केल, तसेच घरगुती काम करणाऱ्यांना मजूरांनाही घरी बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करुनही या मजूर वर्गाला त्यांच्या मालकांकडून वेतन मिळाले नाही. तसेच, या स्थलांतरीत मजूरांच्या निवासाची सोयही करण्यात आली नाही. बिहारच्या भागलपूर येथील अशीच एक घटना समोर आली आहे. खंजरपूर येथील तीन बहिणी गेल्या तीन दिवसांपासून उपाशीपोटी झोपत आहेत. या बहिणींनी अखेर पंतप्रधान कार्यालयास फोन करुन आपली व्यथा सांगितली. 

पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली. बडी खंजरपूर येथील विषहरी परिसरात गौरी कुमारी, आशा कुमारी आणि कुमकुम या तीन बहिणी राहत आहेत. त्यांच्या माता-पित्याचे निधन झाल्याने त्या तिघीच एमकेकींचा सहारा आहेत. त्यांना आणखी एक लहान बहिण असून ती सध्या मावशीकडे राहते. तर, या तिन्ही बहिणी दुसऱ्याच्या घरात मोलमजुरी करुन आपलं सन्मानाने जीवन जगतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे काम गेले असून सध्या त्या घरीच राहतात. तर, घरात पुढील १४ दिवस पुरेल एवढे अन्नही नाही. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान कार्यालयास फोन करुन गेल्या ३ दिवसांपासून उपाशी असल्याची व्यथा मांडली. त्यानंतर, प्रशासनाने तात्काळ मदत पाठवली. 

जगदीशपूरचे सीओ सोनू भगत यांनी याबाबत माहिती दिली, पंतप्रधान कार्यालयातून बिहार आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात, या तिन्ही मुलींनी तात्काळ मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ तेथे जाऊन तिन्ही मुलींच्या जेवणाची सोय केली. तसेच, त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, तिघींचीही प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासना या तिन्ही मुलींची काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारprime ministerपंतप्रधान