शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यांसोबत नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'; पाहा काय मागितली मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 12:32 IST

लॉकडाऊनच्या निर्णयाने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. पण असा निर्णय घेणं देशहितासाठी योग्य आहे

ठळक मुद्देतुमचा कोरोनाशी लढा देण्याचा प्रवास ऑडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल करापंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधलाकोरोनाशी मुकाबला करणाऱ्या रुग्णांची मोदींनी बातचीत केली.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनमुळे देशातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितले.

मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा कोरोनाबाबत भाष्य केले. यामध्ये त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या निर्णयाने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. पण असा निर्णय घेणं देशहितासाठी योग्य आहे त्यामुळे तुम्ही मला माफ कराल ही खात्री वाटते. गोरगरिब जनतेला वाटत आहे हा कसला पंतप्रधान आहे. लोकांना अडचणीत टाकलं. घरात बंद करुन ठेवलं आहे. मात्र भारताच्या १३० कोटी जनतेला वाचवण्यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागला याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कोरोनाशी मुकाबला केलेले रामगप्पा तेज यांच्याशी बातचीत केली. रामगप्पा यांनी मोदींना सांगितले की, क्वारंटाईनला लोकांनी जेल समजू नये. त्यावेळी मोदींनी त्यांना सांगितले की, तुमचा कोरोनाशी लढा देण्याचा प्रवास ऑडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल करा. तसेच मोदींनी कोरोनाग्रस्त कुटुंबाशीही संवाद साधला. कोरोनाशी कशाप्रकारे लढा दिला हे कुटुंबाने मोदींना सांगितले त्यावर तुम्ही आसपासच्या परिसरात कोरोनाबाबत लोकांना घरामध्येच राहण्यासाठी जनजागृती करा असं आवाहन केले. यावेळी एका डॉक्टरांनी मोदींना सांगितले की, आम्हाला उपचारासाठी सरकारकडून योग्य साहित्य मिळत आहे. मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युमुळे रुग्ण भयभीत होत आहेत. तेव्हा आम्ही त्यांना समजावतो की तुम्हाला इतका भयंकर रोग झाला नाही. कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मन की बातमधील महत्त्वाचे मुद्दे

पुण्यातील डॉक्टर बोरसे यांच्याशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. डॉक्टरांनी लोकांना सांगितले वारंवार हात धुवायला हवेत. खोकताना रुमालाचा वापर करावा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वत:ला इतरांपासून विलग ठेवा. आपला देश कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास डॉक्टरांनी मोदींकडे व्यक्त केला.

क्वारंटाईन केलेल्या लोकांनी सोशल डीस्टेंसिंग ठेवावं. अशा लोकांना भेदभावाची वागणूक देऊ नका. ते लोक जबाबदारीने स्वत:ला विलग ठेवत आहेत. यावेळी सोशल डिस्टेंसिंग वाढवा पण इमोशनल डिस्टेसिंग कमी करा

संकटावेळी माणुसकी जपा, गरिबांना जेवण द्या. भारत हे सर्व करु शकतो कारण ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत.

टॅग्स :Man ki Baatमन की बातcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीdoctorडॉक्टर