शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लवकरच देशात कोरोनाचं दहन?; गेल्या ९८ दिवसांत जे घडलं नाही, ते काल घडलं

By कुणाल गवाणकर | Updated: October 25, 2020 09:04 IST

CoronaVirus News: देशातील कोरोना वाढीचा वेग मंदावला; सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ लाखांच्या खाली

नवी दिल्ली: देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. काल दिवसभरात ५८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ९८ दिवसांत पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. 

देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा वेग आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कोरोनानं देशात अक्षरश: थैमान घातलं होतं. १५ सप्टेंबरला देशात कोरोनामुळे १ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काल देशात ५८० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या ९८ दिवसांत प्रथमच इतक्या कमी प्रमाणात कोरोना रुग्ण दगावले.

मुंबईच्या नावे कोरोना बळींची नकोशी नोंद; बनले देशातील पहिले शहर

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. काल दिवसभरात देशात ५१ हजार २३ कोरोना रुग्ण आढळून आले. देशात आतापर्यंत ७८ लाख ६३ हजार ९१३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला ६.७५ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७० लाख ६९ हजार ९९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९.९ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.

आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावा

केरळमधील कोरोना रग्णांच्या संख्येत वाढ
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर केरळ सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. मात्र आता केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनाच्या ८ हजार २५३ रुग्णांची नोंद झाली. 

....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासा

महाराष्ट्रातून गुड न्यूज; दिल्लीनं चिंता वाढवली 
दिल्लीत काल ४ हजार ११६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १८ सप्टेंबरनंतर प्रथमच दिल्लीत इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्येही कोरोना संकटाची तीव्रता वाढली आहे. काल पश्चिम बंगालमध्ये ४ हजार १४८ नवे कोरोना रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी घट पाहायला मिळाली. काल दिवसभरात राज्यात ६ हजार ४१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १३७ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस