शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ऑन ड्युटी गरिबांसाठी.... पोलीस ठाण्यातच महिला कर्मचारी शिजवतायंत अन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 12:41 IST

लॉकडाऊन असल्याने गरिब, मजूर आणि कामगार वर्गाची मोठी उपासमार होत आहे. तसेच, शहरातून आपल्या गावाकडे लोकं पळत आहेत. गावाकडे जाण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंतित आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या १२ तासांत भारतात १३१ नवे रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९६५ वर पोहोचली आहे. मात्र, यामधील १५१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १७६४ इतका झाला आहे. तर, देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने, या कठिण प्रसंगात अनेक ठिकाणी माणूसकीचे दर्शन घडत आहे.  

लॉकडाऊन असल्याने गरिब, मजूर आणि कामगार वर्गाची मोठी उपासमार होत आहे. तसेच, शहरातून आपल्या गावाकडे लोकं पळत आहेत. गावाकडे जाण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, नागरिकांनी आहे तिथेच राहावे असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन असल्याने पोलिसांकडून नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून घरातच बसण्याचे सूचविण्यात येत आहे. तर, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिसांनाही मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यामुळेच, जागोजागी माणूसकीचे दर्शन होत आहे. रायबरेली येथील एका पोलीस ठाण्यातील फोटो सध्या व्हायरल झाला आहे. कारण, या पोलीस ठाण्यातचं गरिबांसाठी भोजनगृह सुरु करण्यात आले आहे. गरिबांसाठी येथेच अन्न शिजविण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी माणूसकीचं मोठं उदाहरण देशापुढे ठेवले आहे. या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वर्दीतली माणूसकी दाखवून दिलीय. 

विशेष म्हणजे येथील महिला पोलीस आपली ड्युटी करुन गरिबांसाठी ही सेवा देत आहेत. तसेच, या गरिबांना त्यांच्यापर्यंत पोहोचून ते अन्न वाटण्याचे काम ते करत आहेत. येथील पोलीस ठाण्याच्या प्रमुख संतोष सिंह यांच्या नियोजनात हे काम सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार राज्यातील कुणीही उपाशीपोटी झोपता कामा नये. त्यामुळेच, आम्ही गरजूंची भूक भागविण्याचं काम करत आहोत. रायबरेलीत कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही, हे पाहणं आमचं कर्तव्य असल्याचं संतोष सिंह यांनी म्हटलं आहे. 

जलौन, उरई येथील महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख नीलेश कुमारी यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह गरिबांना फळे आणि अन्न पुरविण्याचं काम हाती घेतलं आहे. १४ एप्रिलपर्यंत गरजूंना अन्न पुरविण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे नीलेश कुमारी यांनी म्हटलं आहे.  
 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या