शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:02 IST

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,०२६ वर पोहोचली आहे. या मृत्यूंची नोंद केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सगळेच आधीच काही आरोग्य समस्यांनी ग्रस्त होते.

प्रमुख राज्यांतील कोरोना स्थिती
महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिल्लीत ३९३, गुजरातमध्ये ३९७, कर्नाटकमध्ये ३११, केरळमध्ये १४१६, महाराष्ट्रात ४९४, उत्तर प्रदेशात १३८, तामिळनाडूमध्ये २१५ आणि पश्चिम बंगालमध्ये ३७२ सक्रिय रुग्ण आहेत.

केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मृत्यू

केरळमध्ये ८० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती आधीच गंभीर न्यूमोनिया, तीव्र श्वसनाचा त्रास, मधुमेह, उच्च रक्तदाबाने ग्रस्त होता. तामिळनाडूमध्ये टाइप २ मधुमेह आणि पार्किन्सन आजाराने त्रस्त असलेल्या ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला. पश्चिम बंगालमध्ये ४३ वर्षीय महिलेला तीव्र कोरोनरी सिंड्रोम, सेप्टिक शॉक आणि तीव्र मूत्रपिंडाच्या आजार होते, तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती
महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा येथील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या १०वर पोहोचली आहे. सोमवारी राज्यात ५९ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी २० रुग्ण मुंबईत आढळले. सध्या, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८७३ आहे, त्यात ४८३ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोनाची संख्या सतत वाढत असून, ३६९ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या नवीन उपप्रकारांची लक्षणे
कोविड-१९च्या नवीन उप-प्रकाराने, NB.1.8.1, रुग्णांची संख्या वाढवली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)  या उप-प्रकाराची पुष्टी केली असून, हा ओमिक्रॉन प्रकाराचे एक वेगाने पसरलेले आणि बदलणारे रूप आहे. या विषाणूचे लक्षणे सौम्य असतात. त्यात ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, शरीरदुखी, नाक वाहणे आणि भूक कमी होणे यांचा समावेश आहे. हे लक्षणे हंगामी तापासारखीच आहेत. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि लवकर लक्षणे आढळल्यास योग्य उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य