शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

corona virus : एक हजार तबलिगींनी दिली कोरोनाला मात, सरकारने घरी जायची दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 7:31 PM

दिल्लीत निजामुद्दीन येथे हजारो तबलिगी राहत असल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये कोरोनाबाधित असलेल्या एक हजार तबलिगींनी कोरोनावर मात केली आहेज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली आहे.   दिल्लीमध्ये १३ ते २४ मार्चदरम्यान झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला सुमारे १६ हजार ५०० तबलिगी पोहोचले होते

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा होऊन काही दिवस झाले असतानाच दिल्लीत निजामुद्दीन येथे हजारो तबलिगी राहत असल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. दिल्लीतून हे तबलिगी देशातील विविध भागात गेल्याने कोरोनाचा फैलाव करण्यासाठी तबलिगींचे बेजबाबदार वर्तन कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनाबाधित असलेल्या एक हजार तबलिगींनी कोरोनावर मात केली आहे. या आजारातून बरे झालेल्या तबलिगींना घरी जाऊ द्यावे, तसेच ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली आहे.   

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये ४ हजारहून तबलिगी वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या सर्व तबलिगींची तपासणी केली असता त्यापैकी बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. या तबलिगींवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. आता यापैकी एक हजार तबलिगी कोरोनावर मात करून बरे झाले असून, त्यांना घरी जाण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.  

दरम्यान, देशात कोरोनाचा फैलाव करण्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून तबलिगी जमातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. तसेच विविध राज्यांमधील सरकारे आणि प्रशासनानेही कोरोनाच्या फैलावाचे खापर तबलिगींवर फोडले होते.  दरम्यान, मरकजचे संचालक मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  

महत्त्वाच्या बातम्या

coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये १३ ते २४ मार्चदरम्यान झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला सुमारे १६ हजार ५०० तबलिगी पोहोचले होते. दरम्यान, कोरोना संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर या तबलिगींनी देशातील विविध भागात क्वारेंटाईन करण्यात आले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारत