शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कोरोना व्हायरसचा १३.६ कोटी नोकऱ्यांना विळखा; अनेकांना बसावं लागू शकतं घरी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 3:27 PM

पर्यटन आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची स्थिती आहे. मागणी कमी झालेली असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या सध्या टिकून आहेत. मागणी घटल्याने नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार नाहीच. मात्र ज्यांच्या नोकऱ्या टीकून आहेत, त्यांच्यावर देखील संकट आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. सर्वच देशांची आर्थिक स्थिती कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे डबघाईला येत आहे. महासत्ता समजल्या जाणाऱ्या देशांनाही मोठे नुकसान सहन कराव लागत आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे त्या देशांना अधिकच फटका बसणार आहे. कोरोनाचा फटका भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसणार असून येथे कोरोनानंतर १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात सध्या २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील ताजनगरी अर्थात आग्र्याला पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र आता आग्रा निर्मनुष्य झाला आहे. फेब्रुवारीनंतर पर्यटनात मोठी कमी आली आहे. पर्यटनात पुढील सहा महिने उठाव दिसणार नाही. त्यामुळे ट्रॅव्हल एजन्सिजच्या शेकडो कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. अशा स्थिती कार, बसेस धुळ खात पडून राहणार आहेत. तर या कर्मचाऱ्यांना सहा महिने घरी बसून पगार द्यावी लागणार आहे. मात्र हे सर्वांनाच शक्य नाही. अशा स्थितीत अनेकांच्या नोकरीवर संकट येणार आहे.

नोकरी जाण्याचे संकट सर्वाधिक अशा ठिकाणी आहे, जिथे कर्मचाऱ्यांना नियमीत पगार मिळत नाही. पर्यटन उद्योगात देखील नियमीत पगार दिला जात नाही. अनेक लोक कोणत्याही कराराशिवाय काम करतात. यामध्ये गाईड देखील समील आहेत. दुकान, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे पर्यटन आणि सेवा क्षेत्रातील तब्बल २ कोटी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही क्षेत्र सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. ऑक्टोबरनंतरच या क्षेत्रात सुधारणा होईल अशी आशा आहे.

पर्यटन आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची स्थिती आहे. मागणी कमी झालेली असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या सध्या टिकून आहेत. मागणी घटल्याने नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार नाहीच. मात्र ज्यांच्या नोकऱ्या टीकून आहेत, त्यांच्यावर देखील संकट आहे. एकूणच संपूर्ण देशात १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांच येण्याची शक्यता आहे. यामध्ये नॉन एग्रीकल्चर क्षेत्रासह अनेक क्षेत्रांचा समावेश असणार आहे.