शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसचा १३.६ कोटी नोकऱ्यांना विळखा; अनेकांना बसावं लागू शकतं घरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:28 IST

पर्यटन आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची स्थिती आहे. मागणी कमी झालेली असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या सध्या टिकून आहेत. मागणी घटल्याने नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार नाहीच. मात्र ज्यांच्या नोकऱ्या टीकून आहेत, त्यांच्यावर देखील संकट आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. सर्वच देशांची आर्थिक स्थिती कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे डबघाईला येत आहे. महासत्ता समजल्या जाणाऱ्या देशांनाही मोठे नुकसान सहन कराव लागत आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे त्या देशांना अधिकच फटका बसणार आहे. कोरोनाचा फटका भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसणार असून येथे कोरोनानंतर १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात सध्या २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील ताजनगरी अर्थात आग्र्याला पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र आता आग्रा निर्मनुष्य झाला आहे. फेब्रुवारीनंतर पर्यटनात मोठी कमी आली आहे. पर्यटनात पुढील सहा महिने उठाव दिसणार नाही. त्यामुळे ट्रॅव्हल एजन्सिजच्या शेकडो कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. अशा स्थिती कार, बसेस धुळ खात पडून राहणार आहेत. तर या कर्मचाऱ्यांना सहा महिने घरी बसून पगार द्यावी लागणार आहे. मात्र हे सर्वांनाच शक्य नाही. अशा स्थितीत अनेकांच्या नोकरीवर संकट येणार आहे.

नोकरी जाण्याचे संकट सर्वाधिक अशा ठिकाणी आहे, जिथे कर्मचाऱ्यांना नियमीत पगार मिळत नाही. पर्यटन उद्योगात देखील नियमीत पगार दिला जात नाही. अनेक लोक कोणत्याही कराराशिवाय काम करतात. यामध्ये गाईड देखील समील आहेत. दुकान, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे पर्यटन आणि सेवा क्षेत्रातील तब्बल २ कोटी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही क्षेत्र सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. ऑक्टोबरनंतरच या क्षेत्रात सुधारणा होईल अशी आशा आहे.

पर्यटन आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग आणि नॉन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची स्थिती आहे. मागणी कमी झालेली असताना अनेक लोकांच्या नोकऱ्या सध्या टिकून आहेत. मागणी घटल्याने नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार नाहीच. मात्र ज्यांच्या नोकऱ्या टीकून आहेत, त्यांच्यावर देखील संकट आहे. एकूणच संपूर्ण देशात १३.६ कोटी नोकऱ्यांवर टांच येण्याची शक्यता आहे. यामध्ये नॉन एग्रीकल्चर क्षेत्रासह अनेक क्षेत्रांचा समावेश असणार आहे.