शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Update : चिंता वाढली! केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 21:43 IST

देशातील कोरोना रुग्णसंख्येत 4 दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग चार दिवस कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत होती. रोज 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते. मात्र, गुरुवारी सकाळी 30 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

नवी दिल्‍ली - गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 30,570 नवे रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,33,47,325 वर पोहोचली आहे. या नव्या आकडेवारीत 22,182 रुग्ण एकट्या केरळमध्ये समोर आले आहेत. या काळात देशात 431 लोकांचा मृत्यू झाला. यात 182 मृत्यू एकट्या केरळमध्ये नोंदविण्यात आले. गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 58.26 लाख कोरोना लसीचे डोस टोचले गेले आहेत. (Corona Virus india cases increased again in kerala increased cases across the country raised concerns)

देशातील कोरोना रुग्णसंख्येत 4 दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग चार दिवस कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत होती. रोज 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते. मात्र, गुरुवारी सकाळी 30 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

मासिक पाळीत समस्या, कोरोना लसीचा साइड इफेक्ट? 'या' देशात तब्बल 35,000 महिला प्रभावित

केरळमध्ये पुन्हा वाढले रुग्ण -सध्या देशात 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या केरळमधून समोर येत आहेत. गुरुवारी सकाळी कोरोनाचे 17,681 नवे रुग्ण समोर आले. तर 208 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर एकूण रुग्ण संख्या वाढून 44 लाख 24 हजार 46 झाली आहे. तर मृतांचा आकडा 22,987 वर पोहोचला आहे. येथील संक्रमणदर 18 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. तर गुरुवारी सायंकाळी केरलमध्ये 22,182 नवे रुग्ण समोर आले असून 26,563 लोक बरे झाले आहेत. तर 178 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष

अशी आहे महाराष्ट्राची स्थिती -गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात 3 हजार 595 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे चोवीस तासांत राज्यात 3 हजार 240 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 20 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.06 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात एकूण 45 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के इतका आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतhospitalहॉस्पिटल